शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या निविदेचा मार्ग लवकर मोकळा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:35 IST

मोठा गावमधील प्रकल्प बाधितांनी केडीएमसीला दिले इरादा पत्र

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रतील महत्वकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पा तिस:या टप्प्याच्या कामाच्या निविदा काढण्याचा मार्ग लवकर मोकळा होणार आहे. त्यासाठी मोठागाव परिसरातील प्रकल्पबाधितांनी आज त्यांची इरादा पत्र महापालिका प्रशासनास सादर केली. ही इरादा पत्रे सादर करण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने एक शिबीर आज पार पडले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वाचा असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. ७ टप्पे या कामाचे आहे. त्यापैकी टप्पा क्रमांक ४ ते ७ हा दुर्गाडी ते मांडा टिटवाळा दरम्यानचा आहे. या प्रकल्पासाठी ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. याठिकाणी बहुतांश मार्गी लावण्यात आलेले आहे. मात्र या प्रकल्पाच्या तिस:या टप्प्याच्या कामाची निविदा अद्याप काढण्यात आलेली नाही. या प्रकल्पाचा तिसरा टप्पा हा मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी असा आहे. या टप्प्याच्या कामात बाधित होणा:यांचे संमती पत्र आवश्यक आहे. महापालिकेने आत्तार्पयत तिस:या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनापैकी ७२ टक्के भूसंपादन केले आहे. २८ टक्के भूसंपादन करणो बाकी आहे. रिंग रोड हा प्रकल्प महापालिकेच्या हद्दीत केला जात असला तरी त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन हे महापालिकेने करुन द्यायचे आहे. महापालिकेने तिस:या टप्प्यातील ७५ टक्के भूसंपादन केल्यास तिस:या टप्प्याच्या कामाची निविदा काढली जाईल. तिस:या टप्प्यात जवळपास ६५ प्रकल्प बाधित आहे. त्यांच्याकडून प्रकल्पाच्या कामासाठी इरादा पत्र आवश्यक होते. त्यासाठी नगरसेवक म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन आज प्रकल्पबाधितांकरीता इरादा पत्र देण्याकरीता शिबीर आयोजित केले. या शिबीरास नगररचनाकार राजेश मोरे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे प्रयत्नशील आहे. दुर्गाडी ते मांडा टिटवाळा येथील काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्याच धर्तीवर तिस:या टप्प्यातील मोठा गाव ते दुर्गाडी या दरम्यानच्या कामाला सुरुवात व्हावी. भूसंपादनाची प्रक्रिया सुकर करण्यसाठी या शिबीराचे आयोजन केले. प्रकल्पबाधितांनी त्यांच्या जागेच्या बदल्यात टीडीआर दिला जाणार आहे. या शिबीरात सुदर्शन म्हात्रे यांनी सगळ्य़ात प्रथम इरादा पत्र दिले आहे. निविदेसाठी ७५ टक्के भूसंपादनाची अट आहे. ७२ टक्के भूसंपादन पार पडले आहे. ३ टक्के भूसंपादन या शिबीरातून पूर्ण होऊन प्रकल्पाच्या निविदेचा मार्ग मोकळा होणार आहे. उर्वरीत २५ टक्के भूसंपादनाची प्रक्रियाही लवकर मार्गी लावली जाईल असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण