शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या निविदेचा मार्ग लवकर मोकळा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:35 IST

मोठा गावमधील प्रकल्प बाधितांनी केडीएमसीला दिले इरादा पत्र

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रतील महत्वकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पा तिस:या टप्प्याच्या कामाच्या निविदा काढण्याचा मार्ग लवकर मोकळा होणार आहे. त्यासाठी मोठागाव परिसरातील प्रकल्पबाधितांनी आज त्यांची इरादा पत्र महापालिका प्रशासनास सादर केली. ही इरादा पत्रे सादर करण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने एक शिबीर आज पार पडले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वाचा असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. ७ टप्पे या कामाचे आहे. त्यापैकी टप्पा क्रमांक ४ ते ७ हा दुर्गाडी ते मांडा टिटवाळा दरम्यानचा आहे. या प्रकल्पासाठी ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. याठिकाणी बहुतांश मार्गी लावण्यात आलेले आहे. मात्र या प्रकल्पाच्या तिस:या टप्प्याच्या कामाची निविदा अद्याप काढण्यात आलेली नाही. या प्रकल्पाचा तिसरा टप्पा हा मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी असा आहे. या टप्प्याच्या कामात बाधित होणा:यांचे संमती पत्र आवश्यक आहे. महापालिकेने आत्तार्पयत तिस:या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनापैकी ७२ टक्के भूसंपादन केले आहे. २८ टक्के भूसंपादन करणो बाकी आहे. रिंग रोड हा प्रकल्प महापालिकेच्या हद्दीत केला जात असला तरी त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन हे महापालिकेने करुन द्यायचे आहे. महापालिकेने तिस:या टप्प्यातील ७५ टक्के भूसंपादन केल्यास तिस:या टप्प्याच्या कामाची निविदा काढली जाईल. तिस:या टप्प्यात जवळपास ६५ प्रकल्प बाधित आहे. त्यांच्याकडून प्रकल्पाच्या कामासाठी इरादा पत्र आवश्यक होते. त्यासाठी नगरसेवक म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन आज प्रकल्पबाधितांकरीता इरादा पत्र देण्याकरीता शिबीर आयोजित केले. या शिबीरास नगररचनाकार राजेश मोरे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे प्रयत्नशील आहे. दुर्गाडी ते मांडा टिटवाळा येथील काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्याच धर्तीवर तिस:या टप्प्यातील मोठा गाव ते दुर्गाडी या दरम्यानच्या कामाला सुरुवात व्हावी. भूसंपादनाची प्रक्रिया सुकर करण्यसाठी या शिबीराचे आयोजन केले. प्रकल्पबाधितांनी त्यांच्या जागेच्या बदल्यात टीडीआर दिला जाणार आहे. या शिबीरात सुदर्शन म्हात्रे यांनी सगळ्य़ात प्रथम इरादा पत्र दिले आहे. निविदेसाठी ७५ टक्के भूसंपादनाची अट आहे. ७२ टक्के भूसंपादन पार पडले आहे. ३ टक्के भूसंपादन या शिबीरातून पूर्ण होऊन प्रकल्पाच्या निविदेचा मार्ग मोकळा होणार आहे. उर्वरीत २५ टक्के भूसंपादनाची प्रक्रियाही लवकर मार्गी लावली जाईल असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण