शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

दुर्गाडी ते टिटवाळा टप्पा होणार पावसाळ्यापूर्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:43 IST

रिंगरोड प्रकल्प : आयुक्तांची माहिती, कामाची केली पाहणी; एमएमआरडीएचे अधिकारी हजर

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळादरम्यानचे काम येत्या पावसाळ्य़ापूर्वी पूर्ण केले जाईल, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सूर्यवंशी यांनी एमएमआरडीएचे अधिकारी जयवंत ढाणे, सहायक संचालक नगररचनाकार मा. द. राठोड, शहर अभियंत्या सपना देवपनपल्ली-कोळी यांच्यासमवेत प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या कामातील अडचणी सूर्यवंशी यांनी जाणून घेतल्या.दुर्गाडी ते टिटवाळादरम्यानचा रिंगरोड प्रकल्पाचा टप्पा पावसाळ्य़ापूर्वी पूर्ण केला जाईल, तसेच डोंबिवलीतील कोपर उड्डाणपूल आणि आंबिवली येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, हे कामही लवकर पूर्ण केले जाणार आहे. सध्या दुर्गाडी खाडी पुलावरील सहा पदरी पुलाचे काम सुरू आहे. त्याच्या तीन मार्गिका पावसाळ्यापूर्वी वाहतूकीसाठी खुल्या केल्या जातील. या पुलांसह रिंगरोडच्या कामाची आता गती दिल्याचे सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.‘पर्यावरणपूरक कामावर भर’ढाणे यांनी सांगितले की, ‘काही ठिकाणी प्रकल्पासाठी ३५ मीटर रुंदी हवी आहे. तेथे १० मीटरच रस्ता कामाकरिता उपलब्ध आहे. त्यात काय अडचणी आहे, असे किती स्पॉट आहेत. हे जाणून घेतले. रिंगरोड हा उत्तम टिकावा, यासाठी काम कशा पद्धतीने केले जात आहे, त्याची माहिती दिली गेली. रिंगच्या बाजूला उल्हास नदी असल्याने या रस्त्यासाठी मातीचा भराव टाकून रस्ता केला आहे. रस्त्यावर पाणी येऊ नये, तसेच रस्त्याच्या बाजूला पाणी साठले, तरी त्याचा निचरा व्हावा, याची काळजी घेतली आहे. पर्यावरणपूरक काम करण्याचा प्रयत्न केला आहे.’