शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

रेती माफियांचा 'रात्रीस खेळ चाले'; सारे काही सापडूनही अज्ञातांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 13:50 IST

 डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात  रात्रीच्या वेळी   अवैध रेतीउपसा करून त्याची वाहतूकही रातोरात  केली  जात आहे.  विशेष म्हणजे  हे ट्रक पोलिसांच्याही नजरेस पडत नसल्यामुळे आश्चर्य  व्यक्त करण्यात येत आहे.  

- मयुरी चव्हाण 

कल्याण : शहरात पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने गंभीर रूप धारण केले असताना   दुसरीकडे मात्र रेतीमाफियांनी अचूक टायमिंग साधत  कल्याण डोंबिवली शहराचे खाडी किनारे पुन्हा एकदा गिळंकृत करायला सुरवात केली आहे. 

 दिवा - मुंब्रा - कळवा   खाडीपरीसर, डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथील  रेतीबंदर , जुनी डोंबिवली खाडीपरीसर  आदी  भागात  मोठ्या प्रमाणात  अवैध रेती उपसा  सुरु आहे. रेती उपसणे, या रेतीची  पध्दशीरपणे  वाहतूक करणे   हे सर्व प्रकार रात्रीच्या सुमारास सुरू असून सध्या " रात्रीस खेळ चाले" असे म्हणत रेतीमाफियांनी खाडी  किना-यांची अक्षरशः लूट करायला सुरवात केली आहे.                   डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात  रात्रीच्या वेळी   अवैध रेतीउपसा करून त्याची वाहतूकही रातोरात  केली  जात आहे.  विशेष म्हणजे  हे ट्रक पोलिसांच्याही नजरेस पडत नसल्यामुळे आश्चर्य  व्यक्त करण्यात येत आहे.   मध्य रेल्वेवर  ठाकुर्ली , कोपर , कल्याण, कळवा, मुंब्रा , दिवा , डोंबिवली  या रेल्वे  स्थानकादरम्यान  रेल्वेमार्ग  खाडी किना-याच्या  बाजूला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी रेती उपसली जाते. त्यामुळे रेल्वे रुळानाही धोका निर्माण झाला आहे.  विशेष म्हणजे   संक्शन  पंपाद्वारे  खाडीतील रेती उपसा करण्यास  कायद्याने बंदी असूनही हि बंदी  झुगारून   रेतीमाफिया प्रशासनाच्या नाकावर टिच्चून   मध्यरात्रीच्या वेळेत  आपला डाव साधून घेत आहेत. 

 रेतीच्या एका  ब्रासची किंमत सध्या  साडेसहा-  सात   हजार ते आठ  नऊ हजार  आहे.  डोंबिवलीत  मोठागाव आणि कोपर खाडीकिनारा  येथे रात्री  30 ते 40 संक्शन  पाईप लावून  शेकडो ब्रास रेतीचा अवैध  उपसा केला जात आहे.  जागेवरच  रेती खरेदी केली तर  त्याची किंमत  कमी असते. मात्र, इतर ठिकाणी  रेती   वाहून नेल्यास  त्याची किंमत वाढते. 

सस्पेंस कायम रेतीमाफियांवर कारवाई करताना रेतीची वाहतूक करणारे  ट्रक ,संक्शन पंप  व इतर यंत्रसामुग्री जप्त  केली जाते.  रेती उपसा करणा-यांवर  बहुतांश वेळेला  फक्त अज्ञात  व्यक्ती म्हणून  गुन्हे दाखल  केले जात असल्याने खरे  रेतीमाफिया कधीच समोर येत नाही. त्यामुळे ते मोकाट सुटतात.