शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली शेअर भाड्यात १५ रुपये कपात, प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 06:54 IST

Kalyan-Dombivali : कल्याण ते डोंबिवली हे अंतर सहा किलोमीटर आहे. या प्रवासाकरिता शेअर भाडे गेल्या मार्च महिन्यात प्रति प्रवासी २५ रुपये होते. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होता.

कल्याण : कल्याण ते डोंबिवली रिक्षाचे शेअर भाडे १५ रुपयांनी कमी करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रति प्रवासी ५० रुपये भाडे आकारले जात होते. आता प्रती प्रवासी ३५ रुपये आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.  कल्याण ते डोंबिवली हे अंतर सहा किलोमीटर आहे. या प्रवासाकरिता शेअर भाडे गेल्या मार्च महिन्यात प्रति प्रवासी २५ रुपये होते. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होता. जून महिन्यात अनलॉकमध्ये रिक्षा अटींवर सुरू करण्यात आल्या. प्रत्येक रिक्षाचालकाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी तीन ऐवजी दोन प्रवासी घ्यायचे, असा नियम केला; मात्र प्रति प्रवासी भाडे किती आकारायचे, याचा कुठेही नियमावलीत उल्लेख नव्हता. प्रति प्रवासी २५ ऐवजी ५० रुपये शेअर भाडे आकारले जाऊ लागले. रेल्वेसेवा बंद असल्याने सामान्यांना भुर्दंड सहन करत प्रवास करणे भाग होते. रेल्वेसेवा सुरू झाली तरी ५० रुपये भाडे आकारले जात होते. हे भाडे कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. रिक्षाचालकांनी भाड्यात १५ रुपयांची कपात करून तशा आशयाचा फलक माहितीसाठी लावला आहे; मात्र आधीचे २५ रुपये शेअर भाडे पाहता सध्या १५ रुपये कपात करूनही प्रवाशाला १० रुपये जास्तीचेच भाडे द्यावे लागत आहे. आता रिक्षातून तीन प्रवासी घेऊन वाहतूक केली जात आहे. प्रति प्रवासी ३५ रुपये भाडे घेतले तरी एका फेरीला तीन प्रवाशांमागे रिक्षाचालकास १०५ रुपये मिळतात. २५ रुपयांचे ५० रुपये भाडे आकारण्यास आरटीओची परवानगी नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांचे फावले होते. आरटीओने या भाडेवाढीविरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आजही प्रवाशांच्या माथी १० रुपयांची भाडेवाढ आहेच. आरटीओच्या म्हणण्यानुसार  कल्याण क्षेत्रातील सर्व रिक्षा सीएनजीवर चालतात; मात्र काही रिक्षाचालकांनी आरटीओला सीएनजी बसविल्याचे सांगून रिक्षा पेट्रोलवर चालवित आहेत. 

रिक्षाची अघोषित भाडेवाढ कमी करण्याची मागणीमहिन्याभरापूर्वी कॅम्प नंबर तीन ते कल्याण दरम्यानच्या प्रवासी भाड्यात पाच रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यापाठोपाठ कल्याण ते डोंबिवली दरम्यानच्या भाड्यात १५ रुपयांनी कपात झाली आहे. अघोषित भाडेवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. त्यासाठी आरटीओने पुढाकार घेतला पाहिजे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली