शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

केडीएमसीने ‘ती’ अग्निरोधक यंत्रे काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:46 IST

२०१८ मध्ये लावले होते बाटले : भंडाऱ्यातील घटनेनंतर प्रशासन झाले जागे

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेची तपासणी (फायर ऑडिट) करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली मनपाने आपल्या दोन्ही रुग्णालयांचे फायर ऑडिट केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मंगळवारी तब्बल वर्षभरानंतर डोंबिवली विभागीय कार्यालयातील मुदतबाह्य अग्निरोधक यंत्रे काढून नेली आहेत. मात्र, त्याबदल्यात नवीन यंत्रे लावलेली नाहीत. त्यामुळे एखादी आगीची दुर्घटना घडल्यास मनपाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळील इंदिरा गांधी चौकात केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय आहे. तेथे मनपाच्या ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग समितीचा कारभार चालतो. तेथील नागरी सुविधा केंद्रात मालमत्ताकर, पाणीबिले भरण्यासाठी , विविध तक्रारी, समस्यांचे अर्ज देण्यासाठी, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणीसाठी नागरिक दररोज  येतात. या कार्यालयात आग अथवा शॉर्टसर्किटसारखी एखादी दुर्घटना घडल्यास  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ती विझविण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये ८५ अग्निरोधक यंत्रे बसविली होती. या यंत्रांवरील स्टिकरवर त्याची मुदत एक वर्षाची असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये ती बदलणे गरजेचे होते. मात्र, तरीही ती बदललेली नव्हती.भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेमुळे जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने मंगळवारी डोंबिवलीतील कार्यालयातील अग्निरोधक यंत्रे काढून नेली. मात्र, त्या जागी नवीन यंत्रे लावलेली नाहीत. दरम्यान, केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे. या कार्यालयात एखादी आगीची दुर्घटना घडल्यास हाहाकार उडण्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे केंद्र शहराबाहेर आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत घटनास्थळी बंबांना पोहोचण्यास विलंब लागू शकतो. या सर्व शक्यता गृहीत धरून तातडीने अग्निरोधक यंत्रे बसविण्याची मागणी कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे. 

अग्निरोधक बाटल्यांचे रिफिलिंग व्हावे, असा सर्वसाधारण नियम आहे. पण ते जरी केले नसले तरीही लगेच ते कालबाह्य झाले असे होत नाही. दोन वर्षांत रिफिलिंगकेले नसल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून ते नेण्यात आले असतील.- दिलीप गुंड, अग्निशमन अधिकारी, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका