शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीने ‘ती’ अग्निरोधक यंत्रे काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:46 IST

२०१८ मध्ये लावले होते बाटले : भंडाऱ्यातील घटनेनंतर प्रशासन झाले जागे

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेची तपासणी (फायर ऑडिट) करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली मनपाने आपल्या दोन्ही रुग्णालयांचे फायर ऑडिट केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मंगळवारी तब्बल वर्षभरानंतर डोंबिवली विभागीय कार्यालयातील मुदतबाह्य अग्निरोधक यंत्रे काढून नेली आहेत. मात्र, त्याबदल्यात नवीन यंत्रे लावलेली नाहीत. त्यामुळे एखादी आगीची दुर्घटना घडल्यास मनपाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळील इंदिरा गांधी चौकात केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय आहे. तेथे मनपाच्या ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग समितीचा कारभार चालतो. तेथील नागरी सुविधा केंद्रात मालमत्ताकर, पाणीबिले भरण्यासाठी , विविध तक्रारी, समस्यांचे अर्ज देण्यासाठी, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणीसाठी नागरिक दररोज  येतात. या कार्यालयात आग अथवा शॉर्टसर्किटसारखी एखादी दुर्घटना घडल्यास  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ती विझविण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये ८५ अग्निरोधक यंत्रे बसविली होती. या यंत्रांवरील स्टिकरवर त्याची मुदत एक वर्षाची असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये ती बदलणे गरजेचे होते. मात्र, तरीही ती बदललेली नव्हती.भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेमुळे जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने मंगळवारी डोंबिवलीतील कार्यालयातील अग्निरोधक यंत्रे काढून नेली. मात्र, त्या जागी नवीन यंत्रे लावलेली नाहीत. दरम्यान, केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे. या कार्यालयात एखादी आगीची दुर्घटना घडल्यास हाहाकार उडण्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे केंद्र शहराबाहेर आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत घटनास्थळी बंबांना पोहोचण्यास विलंब लागू शकतो. या सर्व शक्यता गृहीत धरून तातडीने अग्निरोधक यंत्रे बसविण्याची मागणी कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे. 

अग्निरोधक बाटल्यांचे रिफिलिंग व्हावे, असा सर्वसाधारण नियम आहे. पण ते जरी केले नसले तरीही लगेच ते कालबाह्य झाले असे होत नाही. दोन वर्षांत रिफिलिंगकेले नसल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून ते नेण्यात आले असतील.- दिलीप गुंड, अग्निशमन अधिकारी, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका