शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

केडीएमसीची निवडणूक लवकरच; जानेवारीत आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:26 IST

प्रस्थापितांना धक्का, २७ गावांना महत्त्व

कल्याण : सरकारने केडीएमसीतून वगळलेली १८ गावे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा मनपात समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने २०१५च्या जुन्या प्रभाग रचनेनुसार कामाला प्रारंभ करा, अशा सूचना मनपाला गुरुवारी दिल्या. जुनाच प्रभाग कायम राहिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला असला, तरी आरक्षण सोडतीत प्रस्थापितांची कोंडी होणार आहे. जानेवारीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार असल्याचे वृत्त असल्याने लवकरच मनपा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे केडीएमसीची निवडणूक पुन्हा १२२ प्रभागांसाठी होणार आहे. आयोगाच्या आदेशाने यावर शिक्कामोर्तब झाले असताना, सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या आरक्षण प्रक्रियेकडे राहणार आहे. २०११ मधील लोकसंख्येच्या आधारेच प्रभाग रचना राहणार आहे. आता केवळ या प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण ठरविताना केडीएमसीमध्ये १२२ प्रभागांमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावली गेली होती. अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमाती तीन आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३३ जागा राखून ठेवल्या आहेत. या आरक्षणात महिलांनाही प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जातीच्या १२ जागांपैकी सहा महिला असतील, तर अनुसूचित जमातीसाठी असलेल्या तीन पैकी दोन जागा महिलांसाठी आहेत, तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी असलेल्या ३३ जागांपैकी १७ जागा महिलांसाठी आहेत. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण या निकषानुसार सध्या १२२ पैकी ६१ महिला प्रभाग आहेत.आगामी निवडणुकीसाठी २००५, २०१० आणि २०१५ च्या निवडणुका विचारात घेता आरक्षण ठरणार आहेत. या निवडणुकांमध्ये जे प्रभाग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, तसेच महिला प्रभाग म्हणून आरक्षित असतील, ते प्रभाग पुन्हा त्या आरक्षणानुसार राहणार नाहीत. त्यामुळे जे प्रभाग आतापर्यंत खुल्या प्रवर्गातील असतील तेथे संबंधित आरक्षण पडण्याची शक्यता आहे. यात प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता आहे.‘ते’ बहुतांश प्रभाग होणार खुले१ जून २०१५ ला २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाली. ऑक्टोबरला केडीएमसीची निवडणूक झाली. त्यावेळी या गावांमधील २१ प्रभाग नवीन होते. पूर्वी तेथे आरक्षण नसल्याने तेथे सर्वच प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, असे आरक्षित झाले होते. आता त्या ठिकाणी आरक्षण पडणार नाही. त्यामुळे बहुतांश प्रभाग हे खुल्या प्रवर्गासाठी राहतील.  मनपाच्या निवडणूक विभागाचे मौनआरक्षण सोडतीचा कार्यक्रम जानेवारीत होईल, असे संकेत सूत्रांकडून मिळत असलेतरी मनपाच्या निवडणूक विभागाने मात्र याबाबत मौन बाळगले आहे. जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकीच्या कामाला सुरुवात करा, असे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याचे सांगत महापालिका सचिव संजय जाधव यांनी या प्रकरणी अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका