शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

‘एनआरसी’ नावाची सोन्याची द्वारका बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:50 IST

कामगारांसाठी मालकाने पाळल्या म्हशी : ६० पैशांत जेवण, १० पैशांत नाश्ता

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : सोन्याची द्वारका आपण पौराणिक कथा, पोथ्यापुराणात वाचली आहे. मात्र, एनआरसी कंपनी व कॉलनीत द्वारकेइतकीच सुबत्ता नव्वदच्या दशकात होती. कामगारांना उच्च प्रतीचे दूध मिळावे याकरिता मालकाने गायी-म्हशी पाळल्या होत्या व डेअरी टाकली होती. कॅन्टीनमध्ये ६० पैशात राइसप्लेट, एक रुपयात मांसाहार, १० पैशांत नाश्ता वर्षानुवर्षे मिळत होता. महिन्याकाठी केवळ दोन रुपये भरुन क्लब हाउसमध्ये टेनिसपासून बिलियर्डपर्यंत सारे खेळ खेळता येत होते. इंग्रजी-मराठी, गुजराती माध्यमाची शाळा, मोफत हॉस्पिटल, घसघशीत पगार आणि बोनस, अशी सगळी सुखे या कॉलनीत पायाशी लोळत होती. एकेकाळी अनेकांनी रेल्वेची सरकारी नोकरी नाकारून एनआरसीची नोकरी पत्करण्यामागे याच सोयीसुविधांचे आमिष होते. परंतु, जशी द्वारका बुडाली तशी एनआरसी बुडाली आणि आज उरली विपन्नता आणि रिकाम्या पोटी सुरू असलेला विलाप.

आंबिवली मोहनेनजीक ४४० एकर जागेवर रसिकलाल चिनॉय यांनी १९४६ साली एनआरसी कंपनीची पायाभरणी केली. कंपनीची उभारणी करण्यास चार वर्षे लागली. १९५० साली कंपनीत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. कंपनीत कापडासाठी धागा तयार केला जात होता. रेयॉन, टायर कोट आणि त्यानंतर नायलॉन तयार होऊ लागले. सुरुवातीला केवळ पाच टनांचे उत्पादन घेतले जात होते. त्यावेळी कंपनीत एक हजार कामगार होते. कंपनी २००९ मध्ये बंद करण्यात आली त्यावेळी कंपनीत ४० टनाचे उत्पादन घेतले जात होते. त्याचबरोबर बारा प्रकारचे बाय प्रॉडक्टस होते. कंपनी बंद पडली तेव्हा कंत्राटी व कायम मिळून ४५०० कामगार होते. चिनॉयकडून ही कंपनी कापडिया यांनी घेतली. त्यानंतर जी. पी. गोयंका यांनी घेतली. कंपनी बंद पडली तेव्हा गोयंका यांचे व्यवस्थापन होते.

कंपनी उत्पादनाकरिता कच्चा माल म्हणून लगदा लागत होता. हा लगदा बांबूपासून तयार होतो. त्याकरिता कंपनीने ३५ एकर जागेवर बांबू प्लॉट विकसित केला होता. त्यात बांबूची शेती केली जात होती. आजही तो परिसर बांबू प्लॉट म्हणून ओळखला जातो. लगद्यासाठी लागणारा कागद हा केरळमधून मागविला जात होता.

nत्याचबरोबर कामगारांसाठी सुसज्ज ६० खाटांचे रुग्णालय होते. मुंबईतील शिवडी सोडले तर टीबी उपचारासाठी स्वतंत्र कक्ष केवळ येथे होता. कंपनीच्या भल्यामोठ्या कॅन्टीनमध्ये एकाचवेळी ६०० पेक्षा जास्त कामगार जेवण घेत. अत्यंत कमी दरात येथे जेवण, नाश्ता मिळायचा. रेशनींगकरिता ग्राहक सोसायटी व गॅस एजन्सी होती. nकंपनीच्या कामगारांचा दिवाळीचा बोनस झाला की, कंपनी परिसरातील दुकानदारांची ‘दिवाळी’ होत असे. गेल्या १० वर्षापासून कंपनीला घरघर लागली आणि ही सोन्याची द्वारका बुडाली.

nकंपनीच्या कामगारांकरिता कामगार वसाहत उभारली होती. त्यात किमान ८०० कामगार आणि अधिकारी रहात होते. तर, अधिकाऱ्यांकरीता बंगले वजा घरे होती. कामगारांच्या मुलांकरिता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा ही इंग्रजी, मराठी आणि गुजराती माध्यमाची होती. nआजही शाळेची इमारत उभी असून शाळा सुरू आहे. तर, कंपनीच्या क्लब हाउसमध्ये महिन्याकाठी पासकरीता दोन रुपये मोजावे लागत होते. nत्यात इनडोअर गेममध्ये टेबल टेनिस, टेनिस, बास्केटबॉल, बिलियर्ड, पत्ते, कॅरम आदी खेळाच्या सुविधा होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चंगळ होती.