शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सिटी पार्कच्या कामासाठी वालधूनी नदी पात्रात भराव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 16:30 IST

Kalyan : प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु केले आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करुन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.

कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु आहे. त्याकरिता टाकण्यात येणारा भरावामुळे वालधूनी नदीचे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्दा वालधूनी जलबिरादरी यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु केले आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करुन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. २०१९ सालच्या अतिवृष्टीचा फटका प्रकल्पाच्या कामास बसला होता. आता कोरोना काळात प्रकल्पाचे काम मंद गतीने सुरु होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कामाला गती मिळाली आहे. याठिकाणी मातीचा भराव टाकला जात आहे. शेजारीच वालधूनी नदीचे पात्र आहे. 

प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. याठिकाणी संरक्षक भिंत बांधली जात आहे. सिटी पार्क प्रकल्पानजीकच गौरीपाडा, योगीधाम, घोलपनगर परिसर आहे. नदी पत्रात भराव टाकून प्रकल्पासाठी संरक्षक भिंत बांधल्यास पावसाळ्य़ात पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग राहणार नाही. सगळे पाणी नागरीकांच्या घरात शिरु शकते, असा मुद्दा बिरादरीच्यावतीने उपस्थित केला आहे. 

या प्रकरणी बिरादरीच्या सदस्या पुष्पा रत्नपारखी यांनी याकडे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर हा विषय बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी सोशल मिडियावर उपस्थित केला आहे. अतिरिक्त मातीचा भराव टाकून नदी वाचविली पाहिजे अशी मागणी रत्नपारखी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, याविषयी महापालिकेचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टीटय़ूटकडे प्रकल्पाचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या होकारानंतरच सिटी पार्कचे काम नियमानुसार केले जात आहे. त्यामुळे भराव टाकणे व संरक्षक भिंतीचे काम योग्य प्रकारे सुरु आहे. त्यामुळे पाणी साचण्याचा धोका संभवत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका