शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

सिटी पार्कच्या कामासाठी वालधूनी नदी पात्रात भराव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 16:30 IST

Kalyan : प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु केले आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करुन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.

कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु आहे. त्याकरिता टाकण्यात येणारा भरावामुळे वालधूनी नदीचे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्दा वालधूनी जलबिरादरी यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु केले आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करुन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. २०१९ सालच्या अतिवृष्टीचा फटका प्रकल्पाच्या कामास बसला होता. आता कोरोना काळात प्रकल्पाचे काम मंद गतीने सुरु होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कामाला गती मिळाली आहे. याठिकाणी मातीचा भराव टाकला जात आहे. शेजारीच वालधूनी नदीचे पात्र आहे. 

प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. याठिकाणी संरक्षक भिंत बांधली जात आहे. सिटी पार्क प्रकल्पानजीकच गौरीपाडा, योगीधाम, घोलपनगर परिसर आहे. नदी पत्रात भराव टाकून प्रकल्पासाठी संरक्षक भिंत बांधल्यास पावसाळ्य़ात पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग राहणार नाही. सगळे पाणी नागरीकांच्या घरात शिरु शकते, असा मुद्दा बिरादरीच्यावतीने उपस्थित केला आहे. 

या प्रकरणी बिरादरीच्या सदस्या पुष्पा रत्नपारखी यांनी याकडे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर हा विषय बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी सोशल मिडियावर उपस्थित केला आहे. अतिरिक्त मातीचा भराव टाकून नदी वाचविली पाहिजे अशी मागणी रत्नपारखी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, याविषयी महापालिकेचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टीटय़ूटकडे प्रकल्पाचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या होकारानंतरच सिटी पार्कचे काम नियमानुसार केले जात आहे. त्यामुळे भराव टाकणे व संरक्षक भिंतीचे काम योग्य प्रकारे सुरु आहे. त्यामुळे पाणी साचण्याचा धोका संभवत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका