शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भय इथले संपत नाही; कल्याण पुर्वेतील कचोरे टेकडीवर राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 14:13 IST

संरक्षक जाळीची मागणी करूनही  प्रशासनांच दुर्लक्ष,  लोकप्रतिनिधीचा आरोप 

केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एनडीआरएफच्या टिमसोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती व नेतीवली क कचोरे टेकडीची पाहणी  केली.  पाहणी झाली मात्र आता पुढे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. कारण कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीवर आजही नागरिक भीतीच्या  छायेखाली रहात आहे. या परिसरात एका ठिकाणी दगड पडू नये म्हणून संरक्षक जाळीसाठी पोल उभे करण्यात आलेय. मात्र या  ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाळी  दिसून येत नाही. गेल्या अनेक  वर्षांपासून संरक्षक जाळी बसवण्याबाबत आम्ही पाठपुरावा करतोय पण याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप स्थानिक  नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला आहे.

डोंगराच्या अगदी तोंडाशी काही घर आहेत. अनेकदा लहान मोठे दगड या ठिकाणी पडतात. मात्र जीव मुठीत घेऊन  आम्ही रहातो अस येथील नागरिक सांगतात.अनेकदा या ठिकाणी दुर्घटना देखील घडल्यात. आम्हाला फक्त सुरक्षा पाहिजे असं येथील नागरिक सांगतात. मात्र  घराच्या तोंडाशी असलेला  हा उंच  डोंगर पाहून तुमच्या मनात सुद्धा धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. 

 मागच्या वर्षी या घरावर  दरड कोसळून संपूर्ण घराचा चक्काचूर झाला होता.अतिवृष्टी झाली तर पुन्हा या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत आम्ही संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना विचारल असता त्यांनी सांगितलं की नुकताच एनडीआरएफच्या  टीम सोबत केडीएमसी आयुक्तांनी या टेकडीची पाहणी केलीय. येथील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली असून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यात.

अतिवृष्टीच्या काळात केडीएमसीनं या लोकांची पर्यायी व्यवस्था केलीये मात्र लोक येथून हालायला मागत नाही, अस त्यांनी सांगितलं. तसेच  या ठिकणी उपाय योजना करण्याबाबत विचार सुरू असल्याच अभियंता सुभाष पाटील यांनी सांगितलं.  आता प्रशासन , कचोरे येथील रहिवासी आणि स्थानिक प्रतिनिधी यांनी एकत्र येत यावर योग्य तो तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे