शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

अखेर तान्हुल्यांचा वडिलांना मिळाला ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:40 IST

प्रतीक्षा संपली; काकीने घेतली जबाबदारी

डोंबिवली : येथील ठाकुर्ली परिसरातील कचोरे खाडीच्या परिसरात दोन लहान मुले सोडून आई बेपत्ता झाल्याच्या घटनेला मंगळवारी आठ दिवसांचा कालावधी उलटला, तरी आई रत्नमाला साहु हिचा शोध लागलेला नाही. तिच्या या कृत्यामुळे पोरक्या झालेल्या दोन्ही तान्हुल्यांचा ताबा अखेर मंगळवारी वडिलांना देण्यात आला आहे. तान्हुल्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या काकूने घेतल्याने जननी आशिष या बालसंगोपन केंद्रातून त्यांचा ताबा घेण्यास बाल कल्याण समितीने मान्यता दिली. संध्याकाळी सातच्या दरम्यान वडील आणि काकीने या दोघांना ताब्यात घेत घर गाठले.खाडी किनारी बेवारस स्थितीत आढळलेली दोन्ही लहान मुले जननी आशिष या बालसंगोपन केंद्रात होती. एकिकडे पत्नी रत्नमाला बेपत्ता असताना वडील सुब्रत यांना लहान मुलांचा ताबाही मिळालेला नव्हता. मागील गुरूवारी बाल कल्याण समितीपुढे झालेल्या सुनावणीत घरात मुलांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम महिला असल्यास मुलांचा ताबा घेऊ शकता असा निर्णय देण्यात आला होता. दरम्यान मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुब्रत यांनी भावाची पत्नी मुलांचा सांभाळ करण्यासाठी आली आहे, अशी माहीती दिली. सुब्रत यांनी समितीपुढे भावाच्या पत्नीलाही उभे केले होते. अखेर मुले सांभाळण्याची खात्री पटल्यावर समितीने मुलांचा ताबा घेण्यास मान्यता दिली. मान्यता मिळताच सुब्रत आणि त्यांची भावजय यांनी जननी आशिष बालसंगोपन केंद्र गाठत दोन्ही तान्हुल्यांचा ताबा घेतला. दरम्यान आठ दिवस उलटूनही बेपत्ता रत्नमालाचा शोध लागलेला नाही.