शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

भयानक! केमिकलचे पाणी थेट रस्त्यावर; त्याच सांडपाण्यातूनच धावतायेत गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:27 IST

कल्याण  पूर्वेतील चक्की नाका परिसरात  विहिरीत साचलेल्या सांडपाण्यामुळे पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला.

मयुरी चव्हाण

कल्याणडोंबिवलीकरांसाठी प्रदूषणाची समस्या काही नवीन नाही. एकीकडे उग्र वासाने  नागरिकांना श्वास घेणे देखील मुश्किल झालय तर दुसरीकडे  रासायनिक  सांडपाणी थेट  वाहतुकीच्या रस्त्यावरच जमा होत असल्याने नाईलाजाने चालकांना या सांडपाण्यातूनच वाट काढत जाव लागतंय.  त्यामुळे  रासायनिक कंपन्या या सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालयं. प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे  येथील प्रदूषण आणि त्यामुळे घडणारे अनुचित प्रकार यांची टांगती तलवार कायम नागरिकांवर आहे. 

कल्याण  पूर्वेतील चक्की नाका परिसरात  विहिरीत साचलेल्या सांडपाण्यामुळे पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर डोंबिवलीतील खंबाळपाडा परीसरात  चेंबर साफ करताना रासायनिक सांडपाणी व त्यामुळे निर्माण झालेल्या घातक गॅस मुळे तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. 

 वास्तविक पाहता पालिका हद्दीत असणाऱ्या ररायासानिक कंपण्या, त्या नेमक्या कुठे वसल्या आहेत, त्यातून निघणा-या सांडपाण्याचा  योग्य तो निचरा  होतो का? हे सांडपाणी पाण्याच्या कोणत्या स्रोतांमध्ये सोडले जाते ? याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह ,पालिका प्रशासनानेही कायम सतर्क असणे आवश्यक आहे.  प्रशासकीय अनास्थेने आजवर अनेक बळी घेतले असले तरी  अजून किती घरातील दिवे  विझण्याची वाट पाहिली जात आहे? हाच प्रश्न निर्माण  झाला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMIDCएमआयडीसीdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण