शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

एनआरसी जमीन खरेदीबाबत कामगार आयुक्तांमार्फत चाैकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 02:24 IST

रामदास आठवले : जमीन ३०० कोटींत खरेदीचा संघटनेचा दावा

 

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या जागेची किंमत सुमारे २१ हजार कोटी रुपये असताना अदानीला ३०० कोटी रुपयांत जागा कशी काय विकली. त्याची कागदपत्रे नेमकी कुठे आहेत,  असा मुद्दा कामगार प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपस्थित केला. आठवले यांनी या प्रकरणात कामगार आयुक्तांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.  एनआरसी कामगार संघर्ष समितीच्या वतीने कामगारांची थकीत देणी मिळावी या मागणीसाठी कंपनीसमोरच गेल्या २१ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री आठवले यांच्याकडे कामगारांनी दाद मागितली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आठवले यांच्यासोबत कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस कामगार नेते भूषण सामंत यांच्यासह कामगार प्रतिनिधी जे. सी. कटारीया, भीमराव डोळस, रामदास वळसे, अदानी उद्योग समूहाचे प्रतिनिधी आणि कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.  साडेचार हजार कामगारांचे जवळपास १७०० कोटी रुपये थकीत देणी आहेत. कंपनी बंद पडल्यावर आजारी उद्योग महामंडळाकडे त्याचा दावा होता. कंपनी मालकाने रहेजाला किती जागा विकली ?  त्याचे पुढे काय झाले ?  दरम्यान युनियनबरोबर किती, कोणते आणि काय करार झाले होते?  याची माहिती सादर करावी. कंपनी कधी लिलावात काढली ? कधी लिलाव झाला ?  किती रकमेची बोली लावत अदानीने जमीन घेतली. याची काही एक माहिती सादर केलेली नाही. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने कामगारांच्या देण्यापोटी देय असलेली जी रक्कम दाखविली त्याचा हिशोब ताळमेळ खात नाही. कंपनीच्या ४४० एकर जागेची किंमत बाजारभाव मूल्यानुसार २१ हजार कोटी रुपये आहे, याकडे कामगार प्रतिनिधींनी लक्ष वेधले.  कामगारांची थकीत देणी, अदानी समूहाकडून कामगारांना देऊ केलेली रक्कम आणि जागेची मूळ किंमत आणि लिलावाची रक्कम यांच्यात कुठेही ताळमेळ दिसून येत नाही. या प्रकरणी कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश आठवले यांनी दिले.दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कामगार आंदोलन करत असून त्यांच्या वसाहती पाडण्याचे काम सुरू असून यावरूनही कामगार आणि कुटुंबांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

nकंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरांचे पाडकाम सुरू आहे, याकडे कामगारांनी लक्ष वेधले असता पाडकामाचे आदेश कुठे आहेत व पाडकामास केडीएमसीने ना हरकत दिली आहे का, अशी विचारणा आठवले यांनी केली. nया प्रश्नावर महापालिका आणि अदानी समूहाच्या प्रतिनिधींच्या उत्तरात विसंगती आढळल्याने  कामगारांची थकीत देणी दिली जात नाही तोपर्यंत कामगारांची घरे तोडू नये, असे आठवले यांनी सांगितले. अदानी यांनी कामगारांना पर्यायी घरे द्यावी, अशी मागणी कामगार प्रतिनिधींनी केली.