शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

एनआरसी जमीन खरेदीबाबत कामगार आयुक्तांमार्फत चाैकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 02:24 IST

रामदास आठवले : जमीन ३०० कोटींत खरेदीचा संघटनेचा दावा

 

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या जागेची किंमत सुमारे २१ हजार कोटी रुपये असताना अदानीला ३०० कोटी रुपयांत जागा कशी काय विकली. त्याची कागदपत्रे नेमकी कुठे आहेत,  असा मुद्दा कामगार प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपस्थित केला. आठवले यांनी या प्रकरणात कामगार आयुक्तांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.  एनआरसी कामगार संघर्ष समितीच्या वतीने कामगारांची थकीत देणी मिळावी या मागणीसाठी कंपनीसमोरच गेल्या २१ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री आठवले यांच्याकडे कामगारांनी दाद मागितली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आठवले यांच्यासोबत कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस कामगार नेते भूषण सामंत यांच्यासह कामगार प्रतिनिधी जे. सी. कटारीया, भीमराव डोळस, रामदास वळसे, अदानी उद्योग समूहाचे प्रतिनिधी आणि कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.  साडेचार हजार कामगारांचे जवळपास १७०० कोटी रुपये थकीत देणी आहेत. कंपनी बंद पडल्यावर आजारी उद्योग महामंडळाकडे त्याचा दावा होता. कंपनी मालकाने रहेजाला किती जागा विकली ?  त्याचे पुढे काय झाले ?  दरम्यान युनियनबरोबर किती, कोणते आणि काय करार झाले होते?  याची माहिती सादर करावी. कंपनी कधी लिलावात काढली ? कधी लिलाव झाला ?  किती रकमेची बोली लावत अदानीने जमीन घेतली. याची काही एक माहिती सादर केलेली नाही. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने कामगारांच्या देण्यापोटी देय असलेली जी रक्कम दाखविली त्याचा हिशोब ताळमेळ खात नाही. कंपनीच्या ४४० एकर जागेची किंमत बाजारभाव मूल्यानुसार २१ हजार कोटी रुपये आहे, याकडे कामगार प्रतिनिधींनी लक्ष वेधले.  कामगारांची थकीत देणी, अदानी समूहाकडून कामगारांना देऊ केलेली रक्कम आणि जागेची मूळ किंमत आणि लिलावाची रक्कम यांच्यात कुठेही ताळमेळ दिसून येत नाही. या प्रकरणी कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश आठवले यांनी दिले.दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कामगार आंदोलन करत असून त्यांच्या वसाहती पाडण्याचे काम सुरू असून यावरूनही कामगार आणि कुटुंबांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

nकंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरांचे पाडकाम सुरू आहे, याकडे कामगारांनी लक्ष वेधले असता पाडकामाचे आदेश कुठे आहेत व पाडकामास केडीएमसीने ना हरकत दिली आहे का, अशी विचारणा आठवले यांनी केली. nया प्रश्नावर महापालिका आणि अदानी समूहाच्या प्रतिनिधींच्या उत्तरात विसंगती आढळल्याने  कामगारांची थकीत देणी दिली जात नाही तोपर्यंत कामगारांची घरे तोडू नये, असे आठवले यांनी सांगितले. अदानी यांनी कामगारांना पर्यायी घरे द्यावी, अशी मागणी कामगार प्रतिनिधींनी केली.