शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सकाळी अर्ज अन् सायंकाळपर्यंत घरात प्रकाश; कल्याण परिमंडलात चार दिवसांत २५ जणांना २४ तासांत नवीन वीजजोडणी

By अनिकेत घमंडी | Updated: July 24, 2023 18:46 IST

संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली.

डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडलात नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करून सर्व प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना अवघ्या २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. यात सकाळी मिळालेल्या अर्जावर सर्व सोपस्कार पूर्ण करून सायंकाळपर्यंत नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली.

उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा तत्परतेने पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विविध उपाययोजना केल्या असून त्याचाच भाग म्हणून ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या अर्जांवर शहरी भागात २४ तासांच्या आत तर ग्रामीण भागात ४८ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याची मोहिम सुरू केली आहे.

या मोहिमेंतर्गत उल्हासनगर दोन विभाग कार्यालयातील तानाजी शाखेतील १८ तर नेताजी शाखा कार्यालयातील एक जणाला २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली. कल्याण पश्चिम विभागातील पारनाका शाखा दोन अंतर्गत एका व्हेईकल चार्जिंग स्टेशनला तसेच डोंबिवली विभागातील टिळकनगर आणि उमेशनगर शाखेतील प्रत्येकी एकाला २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली. यासह वसई, पालघर विभागात जोडणी करण्यात आली. ग्राहकांकडून आनंद व्यक्त अवघ्या एका दिवसात नवीन वीजजोडणी मिळत असल्याने ग्राहकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसत आहे. महावितरणच्या या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी आनंद व्यक्त केला असून महावितरणचे आभार मानले आहेत.  

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण