शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कल्याण, डाेंबिवली रेल्वेस्थानक पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत ५० गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:27 IST

प्रवासी वाहतूक सुरू हाेताच गुन्ह्यांमध्ये वाढ

अनिकेत घमंडीडाेंबिवली : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जूनपासून लाेकलसेवा, तर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर. महिलांनाही लाेकलसेवा उपलब्ध करण्यात आली. लाेकलसेवा सुरू हाेताच रेल्वेतील गुन्हेगारी घटनांनीही डाेके वर काढले आहे. कल्याण आणि डाेंबिवलीच्या लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नाेंद झाली.  कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे.कल्याण जंक्शन स्थानकात  ४२, तर डोंबिवली स्थानक पाेलीस ठाण्यात आठ गुन्हे नोंदचले गेले. कल्याण स्थानकात उत्तरेसह दक्षिणेला जाणाऱ्या बहुतांशी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, तसेच कसारा, कर्जत, खोपोली मार्गावरून व कल्याण स्थानकातून एक हजारांहून जास्त लोकल फेऱ्या हाेतात. त्यामुळे या स्थानकात अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते. त्यात चोरटे त्यांचा डाव साधतात.  डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असले, तरीही त्या स्थानकात फारसे गुन्हे घडत नसल्याचे तीन महिन्यांत निदर्शनास न आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. शार्दुल म्हणाले. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात जून ते ऑगस्ट शून्य गुन्ह्यांची नोंद आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये या रेल्वेस्थानकाच्या पाेलीस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.  

चाेरीचे गुन्हे वाढलेरेल्वेप्रवासादरम्यान जून ते आजतागायत नाेंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे चाेरीच्या गुन्ह्यांचे आहे. आतापर्यंत तीन लाख २७ हजार १६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कल्याणमध्ये सर्वाधिककल्याण-बदलापूर, वांगणी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड, टिटवाळा, आसनगाव, खडवली, वासिंद, कसारा ही गर्दीची स्थानके आहेत. त्यामुळे त्या हद्दीत घडलेली कोणत्याही चोरीची, गुन्ह्यांची नोंद कल्याण स्थानकात होत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण कल्याणमध्ये जास्त असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.