शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

14 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, विकास समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 02:21 IST

Kalyan : नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली.

कल्याण : नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १४ गावांना पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावे अथवा त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने केली आहे. या मागणीकरिताच समितीने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही माहिती दिली आहे.नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली. ही गावे २००७ साली महापालिकेतून वगळण्यात आली. २००९ पासून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. या गावात रस्ते विकास झालेला नाही. पाण्याची तीव्र समस्या आहे. २०१५ साली २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, तेव्हा नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे ठाणे, कल्याण-डोंबिवली अथवा नवी मुंबई महापालिकेस जोडण्याबाबत काही निर्णय घेतला गेला नाही. राज्य सरकारने १४ गावांची नगरपंचायत करण्याचे घोषित केले होते. मात्र, या १४ गावांना नगरपंचायत नको आहे. त्यांना पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट व्हायचे आहे. या मागणीसाठी ग्रामपंयाचत निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.

मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबाजानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या गावातील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना लढविणार असल्याचे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केले. १४ गावांच्या बहिष्काराला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दिला. मनसेच्या पाठिंब्यानंतर राष्ट्रवादीनेही बहिष्काराला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन वालिलकर यांनी जाहीर केले आहे.

१४ गावे काेणती?दहिसर, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, पिंपरी, भंडार्ली, गोठेघर, उत्तरशीव, नारीवली, बाळे, वाळकण, बामल्ली, निघू, नेवाळी, नागाव.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक