शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

14 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, विकास समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 02:21 IST

Kalyan : नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली.

कल्याण : नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १४ गावांना पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावे अथवा त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने केली आहे. या मागणीकरिताच समितीने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही माहिती दिली आहे.नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली. ही गावे २००७ साली महापालिकेतून वगळण्यात आली. २००९ पासून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. या गावात रस्ते विकास झालेला नाही. पाण्याची तीव्र समस्या आहे. २०१५ साली २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, तेव्हा नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे ठाणे, कल्याण-डोंबिवली अथवा नवी मुंबई महापालिकेस जोडण्याबाबत काही निर्णय घेतला गेला नाही. राज्य सरकारने १४ गावांची नगरपंचायत करण्याचे घोषित केले होते. मात्र, या १४ गावांना नगरपंचायत नको आहे. त्यांना पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट व्हायचे आहे. या मागणीसाठी ग्रामपंयाचत निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.

मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबाजानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या गावातील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना लढविणार असल्याचे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केले. १४ गावांच्या बहिष्काराला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दिला. मनसेच्या पाठिंब्यानंतर राष्ट्रवादीनेही बहिष्काराला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन वालिलकर यांनी जाहीर केले आहे.

१४ गावे काेणती?दहिसर, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, पिंपरी, भंडार्ली, गोठेघर, उत्तरशीव, नारीवली, बाळे, वाळकण, बामल्ली, निघू, नेवाळी, नागाव.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक