शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

14 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, विकास समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 02:21 IST

Kalyan : नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली.

कल्याण : नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १४ गावांना पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावे अथवा त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने केली आहे. या मागणीकरिताच समितीने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही माहिती दिली आहे.नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली. ही गावे २००७ साली महापालिकेतून वगळण्यात आली. २००९ पासून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. या गावात रस्ते विकास झालेला नाही. पाण्याची तीव्र समस्या आहे. २०१५ साली २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, तेव्हा नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे ठाणे, कल्याण-डोंबिवली अथवा नवी मुंबई महापालिकेस जोडण्याबाबत काही निर्णय घेतला गेला नाही. राज्य सरकारने १४ गावांची नगरपंचायत करण्याचे घोषित केले होते. मात्र, या १४ गावांना नगरपंचायत नको आहे. त्यांना पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट व्हायचे आहे. या मागणीसाठी ग्रामपंयाचत निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.

मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबाजानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या गावातील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना लढविणार असल्याचे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केले. १४ गावांच्या बहिष्काराला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दिला. मनसेच्या पाठिंब्यानंतर राष्ट्रवादीनेही बहिष्काराला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन वालिलकर यांनी जाहीर केले आहे.

१४ गावे काेणती?दहिसर, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, पिंपरी, भंडार्ली, गोठेघर, उत्तरशीव, नारीवली, बाळे, वाळकण, बामल्ली, निघू, नेवाळी, नागाव.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक