शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

केडीएमसीच्या तिजोरीमध्ये १०३ कोटींची भर; योजनेच्या मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:30 IST

KDMC : मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने अभय योजनेतून मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी १०३ कोटी ९१ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबरला संपत असल्याने येत्या चार दिवसांत त्याचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा व त्यांची थकीत रक्कम भरावी, असे आवाहन मनपाने केले आहे.मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला. कोरोनाकाळात थकबाकीदारांकडून सक्तीची करवसुली करता आली नाही. मनपाने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी १५ ऑक्टोबरपासून अभय योजना लागू केली. आतापर्यंत या योजनेतून मनपाला १०३ कोटी ९१ लाख रुपये मिळाले आहेत.अभय योजना लागू करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्रकारांनी विचारले होते की, यापूर्वीही मनपाने सरसकट अभय योजना लागू केली असता तिला अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यावर त्यांनी या योजनेतून १०० कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, योजनेची मुदत संपण्यापूर्वीच चार दिवस आधी मनपाच्या तिजोरीत १०३ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले आहेत. येत्या चार दिवसांत आणखीन काही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.मनपाला यापूर्वी जाहीर केलेल्या अभय योजनेतून एक हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, तेव्हा ६५ कोटी जमा झाले होते. परंतु, यंदा १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात यश आले आहे. अभय योजनेचे १०३ कोटी ९१ लाख धरून मनपाने आतापर्यंत २४० कोटी रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली आहे.

मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हातीअभय योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय हा आयुक्तांवर अवलंबून असेल. मुदतवाढ न दिल्यास ३५० कोटींचे वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी वसुली विभागाच्या हाती आणखीन तीन महिने आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मालमत्ता करवसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका