शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

केडीएमसीच्या तिजोरीमध्ये १०३ कोटींची भर; योजनेच्या मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:30 IST

KDMC : मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने अभय योजनेतून मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी १०३ कोटी ९१ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबरला संपत असल्याने येत्या चार दिवसांत त्याचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा व त्यांची थकीत रक्कम भरावी, असे आवाहन मनपाने केले आहे.मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला. कोरोनाकाळात थकबाकीदारांकडून सक्तीची करवसुली करता आली नाही. मनपाने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी १५ ऑक्टोबरपासून अभय योजना लागू केली. आतापर्यंत या योजनेतून मनपाला १०३ कोटी ९१ लाख रुपये मिळाले आहेत.अभय योजना लागू करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्रकारांनी विचारले होते की, यापूर्वीही मनपाने सरसकट अभय योजना लागू केली असता तिला अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यावर त्यांनी या योजनेतून १०० कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, योजनेची मुदत संपण्यापूर्वीच चार दिवस आधी मनपाच्या तिजोरीत १०३ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले आहेत. येत्या चार दिवसांत आणखीन काही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.मनपाला यापूर्वी जाहीर केलेल्या अभय योजनेतून एक हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, तेव्हा ६५ कोटी जमा झाले होते. परंतु, यंदा १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात यश आले आहे. अभय योजनेचे १०३ कोटी ९१ लाख धरून मनपाने आतापर्यंत २४० कोटी रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली आहे.

मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हातीअभय योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय हा आयुक्तांवर अवलंबून असेल. मुदतवाढ न दिल्यास ३५० कोटींचे वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी वसुली विभागाच्या हाती आणखीन तीन महिने आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मालमत्ता करवसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका