हितेन नाईक, पालघर - रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात ट्रॅक आणि प्लॅटफॉर्ममध्ये सापडलेल्या तरुणीचा वेळेत मदत न मिळाल्याने मृत्यू झाला. अंधेरी स्थानकात जखमी झालेल्या तरुणीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. रेल्वे गार्डसह एकाही रेल्वे पोलिसाने वेळेत मदत केली असती तर या तरुणीचा जीव निश्चितच वाचला असता, असा आरोप तिला मदत करणार्या प्रवाशांनी केला आहे. पालघर तालुक्यातील सातपाटी येथील होळीमाता मंडळाजवळ राहणारी सुदैवी रामदास मेहेर (३५) ही तरुणी आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावता आधार. दोन लहान बहिणींची लग्ने करून दिल्यानंतर शिक्षण घेणार्या आपल्या लहान भावासोबत वृद्ध आईवडिलांची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी दररोज पहाटे उठून नोकरीनिमित्त गोरेगाव गाठत असे. नेहमीप्रमाणे काल तिने संध्याकाळी सहा वाजता आॅफीस सोडले व अंधेरी स्टेशनवरून पालघरकडे जाणारी ६.२५ ची फ्लार्इंग राणी पकडण्यास ती निघाली. अंधेरीचा ब्रिज उतरत असतानाच गाडी स्टेशनवर आल्याने महिलांच्या डब्यातील आपली जागा पकडण्यासाठी तिने दरवाजाचा हँडल पकडला, मात्र तोल गेल्याने ती खाली पडून ट्रेनसोबत (पान ३ वर)
मदतीअभावी जखमी तरुणीचा मृत्यू
By admin | Updated: May 21, 2014 08:56 IST