शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

दुसर्‍या वर्षी लग्न, १३ व्या वर्षी वैधव्य!

By admin | Updated: June 17, 2015 15:36 IST

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सांस गावात गेल्या शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने सोहनी देवी या निष्पाप बालिकेचे आयुष्य पार उद्ध्वस्त झाले आहे. वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षी विवाह झालेली सोहनी देवी आज १३ वर्षांची आहे आणि पतीच्या घरी नांदायला जायच्या आधीच या बस अपघाताने तिच्या नशिबी वैधव्य आले.

बस अपघाताने सोहनी देवीचे आयुष्य उद्ध्वस्तजयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सांस गावात गेल्या शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने सोहनी देवी या निष्पाप बालिकेचे आयुष्य पार उद्ध्वस्त झाले आहे. वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षी विवाह झालेली सोहनी देवी आज १३ वर्षांची आहे आणि पतीच्या घरी नांदायला जायच्या आधीच या बस अपघाताने तिच्या नशिबी वैधव्य आले आहे!शुक्रवारी सांस गावात रस्त्यावरून जाणारी एक बस खाली लोंबणार्‍या विजेच्या एका जिवंत तारेच्या संपर्कात आली आणि त्यात सोहनी देवीचा १५ वर्षांचा पती सुखीराम गुज्जर याच्यासह १६ प्रवासी भाजून मृत्युमुखी पडले.ज्या वयात इतर मुले हसत-बागडत शाळेत जातात त्या वयात आपल्यावर कोसळलेल्या या दु:खाची पूर्णांशीने कल्पना येण्याचे खरे तर सोहनी देवीचे वयही नाही. सोहनीचे माहेर चानवाडिया गावातील आहे. बालविवाह झालेली सोहनी देवी इतकी वर्षे माहेरीच राहत आहे. काही वर्षांपूर्वी तिने शाळा सोडली आहे. आता वयात आल्याने काही महिन्यांत तिला रिवाजानुसार पतीच्या घरी पाठविले जायचे होते; पण त्याआधीच नियतीने तिच्यावर हा असा क्रूर घाला घातला आहे.सध्या सुखीरामच्या क्रियाकर्मांसाठी सोहनी देवीला सासरच्या घरी आणण्यात आले आहे; पण अनोळखी घरात आल्याने तिने रडून आक्रोश चालविला आहे. बस अपघातात जखमी झालेल्या २० प्रवाशांवर येथील एसएमएस इस्पितळात उपचार सुरू आहेत. शेजारच्या बच्छेडा गावाचे सरपंच रामदेव गुज्जर त्यासाठी धावपळ करीत आहेत. सोहनी देवीच्या शोकांतिकेने हृदय पिळवटून गेल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. निरागसतेने आक्रोश करणार्‍या सोहनीकडे बघवत नाही, असे पाणावलेल्या डोळ्यांनी सांगताना रामदेव म्हणाले की, लग्नाच्या दिवशी आई-वडिलांच्या मदतीने अग्निभोवती सात फेरे घेणार्‍या दोन वर्षांच्या सोहनीची छबी आजही डोळ्यापुढून जात नाही.सुखीरामनेही दोन-तीन इयत्तांनंतर शाळा सोडली व तो शेतीच्या कामात कुटुंबियांना मदत करायचा.राजस्थानच्या ग्रामीण भागांत आजही बालविवाहांची कुप्रथा प्रचलित आहे. बस अपघातामुळे सोहनी देवीची शोकांतिका समोर आली; पण ही तिची एकटीची शोकांतिका मात्र नक्कीच नाही, असे बालहक्क संघटनेचे कार्यकर्ते रवी शर्मा यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)