शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

हँग ओव्हरच्या नादात दृष्टी गेली

By admin | Updated: June 27, 2015 03:01 IST

त्या दिवशी रात्री मालवणीत अनेकांनी मिथेनॉलमिश्रित विषारी दारूचे घोट घेतले होते. या भीषण दारूकांडाने १०४ बळी घेतलेच पण रात्रीच्या दारूचा हँग ओव्हर

मुंबई : त्या दिवशी रात्री मालवणीत अनेकांनी मिथेनॉलमिश्रित विषारी दारूचे घोट घेतले होते. या भीषण दारूकांडाने १०४ बळी घेतलेच पण रात्रीच्या दारूचा हँग ओव्हर असल्याने याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक मद्यपींना आपली दृष्टी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी अनेक मद्यपींना अंधूक दिसणे, डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. मात्र रात्रीच्या दारूचे नेहमीप्रमाणे हँग ओव्हर असेल असे समजून अनेक मद्यपींनी त्याकडे दुर्लक्ष केले. डोळ्यांचा त्रास जाणवल्यावर वेळेत उपचार केले असते तर काहींची दृष्टी वाचू शकली असती, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जास्त काही त्रास होणार नाही, जाऊ दे म्हणून दुर्लक्ष केल्यामुळेच अनेकांना दृष्टी गमवावी लागली.मिथेनॉल हा एक विषारी पदार्थ आहे. मिथेनॉल केमिकलचा डोळ्यांच्या नसांवर सर्वांत आधी परिणाम होऊ लागतो. मिथेनॉल प्राशन केलेल्या व्यक्तीला ४८ तासांत उपचार मिळाल्यास त्याची दृष्टी वाचवता येऊ शकते. मात्र यापेक्षाही जास्त उशीर झाल्यास दृष्टी वाचवणे शक्य होत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या मालवणीतील काही मद्यपींना दृष्टिदोष निर्माण झाला आहे. तर काहींनी दृष्टी गमावली असून याचा नेमका आकडा पालिकेकडून जाहीर करण्यात आलेला नाही. या सर्वांची डोळ्यांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान दारुकांडातील रुग्णालयात दाखल असलेल्या किती जणांच्या दृष्टीला हानी झाली, याची माहिती घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)