शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कधी पास कधी नापास

By admin | Updated: April 9, 2015 05:49 IST

राज्य शिक्षण मंडळाकडून सोलापूर येथील एका विद्यार्थ्याला दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतर

पुणे : राज्य शिक्षण मंडळाकडून सोलापूर येथील एका विद्यार्थ्याला दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतर काही कागदपत्रांसाठी त्याने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केला असता तो दहावीमध्ये नापास असल्याचे कळविण्यात आले. सोलापूर येथील दीपक बलभीम ढावरे या विद्यार्थ्याने २००० साली इयत्ता दहावीची परीक्षा दिली. त्या वेळी शिक्षण मंडळाकडून त्यास गणित विषयात नापास असल्याची गुणपत्रिका मिळाली. परिणामी त्याने अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला नाही. परंतु, दीपककडून दहावीची ही गुणपत्रिका हरवली. त्यामुळे २००३ मध्ये त्याने विभागीय शिक्षण मंडळाकडे डुप्लिकेट गुणपत्रिका मिळण्यासाठी अर्ज केला. त्या वेळी शिक्षण मंडळाकडून त्यास दहावीत उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे दीपकने पुढे शिक्षण सुरू केले. पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले आणि डिसेंबर २०१४ मध्ये त्याने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे बोर्ड सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. परंतु त्यावेळी त्याला दहावीत नापास असल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पास असल्याचे प्रमाणपत्र मिळावे, असा अर्ज त्याने राज्य शिक्षण मंडळाकडे केला आहे. दरम्यान, दीपक ढावरेला चूकून त्याच्या बहिणीचे गुण दिले गेले. परंतु, त्याने तिस-यांदा गुणपत्रकाची मागणी केली. त्या वेळी त्याला नापास असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे विभागीय शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.