शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

‘दादा’ होण्यासाठी दोन मुलांनी गाठली मुंबई

By admin | Updated: June 10, 2014 14:13 IST

औरंगाबाद : चित्रपट, टीव्ही मालिका व आजूबाजूच्या वातावरणाचा मुलांच्या जीवनावर काय परिणाम होतो त्याचा प्रत्यय इंदिरानगर, गारखेडा परिसरातील दोन कुटुंबांना चांगलाच आला.

औरंगाबाद : चित्रपट, टीव्ही मालिका व आजूबाजूच्या वातावरणाचा मुलांच्या जीवनावर काय परिणाम होतो त्याचा प्रत्यय इंदिरानगर, गारखेडा परिसरातील दोन कुटुंबांना चांगलाच आला. अवघ्या १०-११ वर्षांच्या दोन्ही बालकांनी ‘मुंबई जाकर हम दादा बनिंगे... वहाँच बडे बनेंगे’ असा विचार करून ते गुपचूप रेल्वेने मुंबईला पळून गेल्याची घटना ५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. त्याचे झाले असे की, इंदिरानगर, गारखेडा परिसरातील रहिवासी शेख शाहरुख यांचा १० वर्षांचा मुलगा शेख आदिल व शेख अनिस यांचा ११ वर्षांचा मुलगा शेख मेहराज हे दोघे जण मित्रांसोबत खेळायला जातो म्हणून गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. आदिल व मेहराज हे दोघे जण जिवलग मित्र. दोघेही यंदा ५ वीत गेले आहेत. दोघांच्या शाळा वेगवेगळ्या असल्या तरी एकाच वसाहतीत राहत असल्यामुळे ते दोघे सतत सोबत राहायचे. गुरुवारी सकाळी खेळता खेळता दोघांनी येथून मुंबईला पळून जाण्याचा विचार केला. ‘मुंबईत जाऊ. तेथे काहीही कामधंदा करून मोठे होऊ. मुंबईचे आपण दादा बनून पैसे कमवू’ असा विचार केला व रेल्वेने बसून कल्याण गाठले. कल्याण रेल्वेस्टेशनवर ते दोघेही उतरले. तेव्हा त्यांना तेथील पोलिसांनी हटकले. तेव्हा आमचे आई-वडीलही येथेच झोपले आहेत, अशी थाप मारून ते निसटले. रात्रभर ते कल्याण रेल्वेस्टेशनमधील एका प्लॅटफॉर्मवरच झोपले. तिसऱ्या दिवशी मात्र, त्यांची वाईट अवस्था झाली. त्यामुळे त्यांनी परत औरंगाबादकडे जाणारी रेल्वे पकडली. दुर्दैव असे की, मेहराजला नेमकी त्यावेळी तहान लागली अन् तो खाली उतरला. तेवढ्यात रेल्वे निघाली. आदिल शेख हा सुखरूप औरंगाबादला आपल्या आई- वडिलांकडे पोहोचला. मेहराजच्या शोधार्थ त्याचे आई- वडील कल्याणकडे रवाना झाल्याची माहिती जवाहरनगर ठाण्याचे जमादार आर. डी. नरवडे यांनी दिली.