शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

कच-यात महाराष्ट्र आघाडीवर!

By admin | Updated: April 6, 2015 04:54 IST

देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीदेशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे. शहराची कचरापट्टी करण्यात मुंबईकरांनी दिल्लीकरांनाही मागे टाकले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील सव्वाशे कोटी नागरिक रोज १ लाख ४३ हजार ४४९ टन कचरा करतात. त्यात महाराष्ट्रात तयार होणाऱ्या २६,८२० टन दैनिक कचऱ्याचा वाटा १८ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी फक्त ४,७०० टन कचऱ्याचीच पद्धतशीर विल्हेवाट लावली जाते, बाकीचा कचरा प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतो.देशात घनकचरा व्यवस्थापनाची एकूण काय स्थिती आहे याविषयी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या अहवालानुसार उत्तर प्रदेशमध्ये दररोज १९,१८० टन, आंध्र प्रदेश/ तेलंगणमध्ये ११,५०० टन, गुजरातमध्ये ९,२२७ टन, कर्नाटकात ८,७८४ टन तर दिल्लीत ८,३९० टन कचरा तयार होतो.अहवालानुसार जेथे रोज १०० ते ५०० टन कचरा तयार होतो अशी ७० शहरे आहेत तर ५० ते १०० टन दैनिक कचरानिर्मिती करणाऱ्या शहरांची संख्या ६० आहे. दररोज ५०० टन किंवा त्याहून अधिक कचरा तयार होणाऱ्या शहरांमध्ये मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, सूरत, आग्रा, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ आणि कोलकाता यांचा समावेश होतो.