शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

रायगडमध्ये किसान वॉटर बँक

By admin | Updated: May 6, 2015 00:59 IST

रायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे.

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून निर्माण होणारे पाणी फक्त ५० पैसे प्रति लिटर दराने देण्यात येणार असल्याचे किसान वॉटर बँकेचे मदन हरप्रित सिंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.व्यावसायिक दृष्टिकोन समोर न ठेवता केवळ सामाजिक दायित्व म्हणून हा प्रकल्प जनतेसाठी सुरु करीत आहे. यासाठी जिल्ह्यात जागेची पाहणी सुरु केली असल्याचे सिंग यांनी सांगितले. कोकणातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे बोलले जाते.हा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येणार आहे. पाणी शुध्द करणाऱ्या यंत्रांची किंमत ही सुमारे २० लाख रुपये आहे. सध्या हे यंत्र दुबईसह राजस्थान, ओडिसा आणि दक्षिण भारतामध्ये कार्यरत असून त्याचा रिझल्ट सकारात्मक असल्याचे सिंग म्हणाले. स्वत:च्या विकासासाठी सर्व ग्रामीण भागातून शहराकडे धावतात, आम्ही मात्र खेड्यांच्या विकासासाठी ग्रामीण भागात काम करु इच्छितो, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.प्रकल्प सुरु करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. सध्या श्रीवर्धनमधील जागेची चाचपणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्राचे खारे पाणी गोड म्हणजेच पिण्यायोग्य होत असल्याने हा प्रकल्प सुरु झाल्यास पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.