शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

बॉलीवूडकरांची ‘गॅलक्सी’च्या दारी धाव !

By admin | Updated: May 8, 2015 05:49 IST

गुरुवारी सकाळी सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले; पण घरातील दुसरा एकही सदस्य घराबाहेर दिसला नाही.

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी व अभिनेत्रींनी सलमानची भेट घेण्यासाठी त्याचे गॅलक्सी अपार्टमेंट्स गाठले. सलमानला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर कुटुंबीयांसह सर्व बॉलिवूडलासुद्धा धक्का बसला आहे. त्यामुळे सलमानला दिलासा देण्यासाठी बॉलीवूडच्या स्टार्सची रीघ लागली आहे.गुरुवारी सकाळी सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले; पण घरातील दुसरा एकही सदस्य घराबाहेर दिसला नाही. बुधवारी रात्री सलमान जेव्हा दिवसभर कोर्टात राहून जामीनावर घरी परतला होता, तेव्हापासून चाहत्यांनी घराबाहेर गर्दी केलेली दिसून आली. सलमानने खास सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी सकाळपासून खासगी बाऊन्सर गॅलक्सी आवारात तैनात केले होते. शिवाय, दिवसभर सलमानचे कुटुंबीय त्याच्यासोबतीला घरीच असलेले दिसून आले. सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळाल्याचे कळताच बॉलिवूड सेलेब्सनी सलमानच्या घरी त्याची भेट घेण्यासाठी गर्दी केली. अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेत्री प्रीती झिंटा, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, निर्माता रितेश सिधवानी, अभिनेता सोनू सुद, अभिनेता करिश्मा कपूर, अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेता चंकी पांडे, अभिनेत्री बिपाशा बसू, भाजपा प्रवक्त्या शायना एनसी, माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि टीव्ही अभिनेता संतोष शुक्लासह अनेक सेलिब्रिटी सलमानला भेटण्यासाठी त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले. परंतु, सलमानची एक्स-गर्लफ्रेंड असलेल्या कतरिना कैफने मात्र सलमानविषयी काहीच माहिती करून घेतली नसल्याचे कळते आहे. (प्रतिनिधी)> भाजपा खासदार हेमा मालिनी, राज बब्बर, सुप्रियो बाबूल, मनोज तिवारी अशा बॉलिवूडच्या अनेक आजी-माजी कलाकारांनी बुधवारपासून सलमानची तळी उचलून धरली आहे. त्याला कमीतकमी शिक्षा व्हावी याकरिता प्रार्थना करीत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. असे असतानाही राज व राणे यांनी सलमानची भेट घेतल्यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उभयतांवर तोंडसुख घेतले. सलमानला न्यायालयाने दोषी ठरवल्यावर या दोघांनी त्याची भेट घ्यायला नको होती, अशी टिष्ट्वटरद्वारे प्रतिक्रिया दिली. भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले की, कायद्याचा मान राखण्यासाठी ज्याने प्रामाणिकपणे कर्तव्यपूर्ती केली त्या पोलिसाच्या कुुटुंबीयांना भेटायला हे गेले नाहीत. त्यांना सामान्य माणसाशी काही देणेघेणे नाही. त्यावर भाजपाच्या काही लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेकडे भांडारी यांचे लक्ष वेधले असता भाजपाच्या वतीने कुणी अशी भूमिका घेतली असेल तर ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याची सारवासारव केली.