शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

चोरीच्या मार्गाने आले ५० टन सोने

By admin | Updated: May 21, 2014 02:19 IST

सरकारने आयातीवर लादलेल्या निर्बंधांमुळे चोरीच्या मार्गाने देशात येणार्‍या सोन्यामध्ये वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : सरकारने आयातीवर लादलेल्या निर्बंधांमुळे चोरीच्या मार्गाने देशात येणार्‍या सोन्यामध्ये वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात ५० टन सोने चोरीच्या मार्गाने आल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या अहवालात म्हटले आहे. सन २०१३मध्ये तस्करीद्वारे भारतात २०० टन सोने आल्याची शक्यता कौन्सिलने याआधी व्यक्त केली होती. सोन्याच्या मागणीतील बदलाबाबत वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जाहीर केलेल्या एका अहवालाच्या पार्श्वभूमीवर कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम् यांनी ही माहिती दिली. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवार ते मार्च) देशात सुमारे ५० टन सोने हे चोरीच्या मार्गाने आले असण्याचा अंदाज आहे. सोन्याच्या देशांतर्गत मागणीपैकी सुमारे २० ते २५ टक्के मागणी ही चोरीच्या मार्गाने येणार्‍या सोन्यामार्फत पूर्ण केली जात असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. भारतात अनधिकृत मार्गाने दाखल होत असलेल्या सोन्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून त्याचा फटका प्रामाणिकपणे व्यवहार करणार्‍यांना बसत असल्याचे सोमसुंदरम् यांनी स्पष्ट केले. भारत मुख्यत: मध्य-पूर्वेतील देशांकडून सोन्याच्या दागिन्यांची आयात करीत असतो. सध्या या देशांमध्येही सोन्याचे भाव वाढले असल्याने वाढत्या आयातीला त्यामुळे खीळ बसताना दिसत आहे. सोन्याची चोरटी आयात थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केंद्र सरकारने केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)