शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नशिराबादला जि.प.चे अधिकारी मोजणीविनाच माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

नशिराबाद : नवीन प्लॉट एरियासह अन्य काॅलन्यांमधील गटारीचे व सांडपाणी लक्ष्मीनगरकडे नको, अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही ...

नशिराबाद : नवीन प्लॉट एरियासह अन्य काॅलन्यांमधील गटारीचे व सांडपाणी लक्ष्मीनगरकडे नको, अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही समांतर सुनसगाव रस्त्याच्या मार्गाने गटारी काढा. मात्र, त्यालाही शेतकऱ्यांच्या विरोध होत असल्यामुळे नेमके आता गटारी काढायची कशी, असा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी या परिसरात गटारी बांधकामाच्या मोजमाप करण्याकरिता आले असताना, लक्ष्मीनगरातील नागरिकांनी त्यांना विरोध दर्शवून मोजमाप करू न देता माघारी पाठविले.

लक्ष्मीनगर परिसरात तीर्थक्षेत्र स्वामी समर्थ केंद्र आहे. या परिसरात दत्तनगर, द्वारकानगर यांच्यासह अन्य पाच ते सहा काॅलनीचे सांडपाणी, गटारीचे पाणी लक्ष्मीनगर परिसरात तुंबत असल्याने, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी इकडे नको, दुसरा मार्ग शोधा, अशी मागणी लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांची बैठक घेऊन, त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बापू चौधरी, राहुल चौधरी, भूषण साळुंखे, नरेंद्र निकम, पिंटू पवार, रवींद्र लोहार, सोपान माळी यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे.

समांतर गटारीची मागणी

सुनसगाव रोडला समांतर गटारी करा, अशी मागणी लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. मात्र, याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पूर्वीपासून गटारीचे पाणी तापीच्या दिशेने जाते, त्यामुळे इकडे नवीन गटारी खोदू नका, असा पवित्रा शेतकरी वर्ग घेत आहे.

पंधरा लाख खर्चून गटारीचे काम

या परिसरातील गटारीचा प्रश्न मार्गी लागावा, म्हणून जिल्हा परिषदेकडून १० ते १५ लाख रुपयांच्या पक्क्या गटारी बांधकाम करण्यात येत आहे. लक्ष्मीनगर परिसरातून नैसर्गिक प्रवाह गटारीचा असल्यामुळे त्याच मार्गाने गटारी करण्याचे नियोजन आहे. त्या परिसरात सुमारे एक ते दीड मीटर आरसीसी ढापे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिली.