शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Suspended : IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
3
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
4
Operation Sindoor Live Updates: IPL सामने रद्द होण्याची शक्यता, BCCI घेणार निर्णय
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
6
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
7
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
8
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
9
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
10
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
11
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
12
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
13
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
14
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
15
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
16
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
17
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
18
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
19
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
20
Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी

तरुण वळले शेळीपालनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 18:06 IST

उत्पन्न खर्चही निघू शकत नाही अशा विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.

महेंद्र रामोशे / ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 15 - गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर उत्पन्न जास्त आले तर बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे उत्पन्न खर्चही निघू शकत नाही अशा विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.  या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतक:यांनी शेळीपालन हा पूरक व्यवसाय सुरू केला आहे.  ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित तरुण शेळीपालनाच्या व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे आज अमळनेर तालुक्यात तब्बल 23 गावांमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय जोमात सुरू झालेला आहे. शेळीला गरिबांचे धन म्हटले जाते. आजही ग्रामीण भागात शेळी पाळणे हा व्यवसाय आर्थिक दुर्बल घटकापुरताच मर्यादित आहे. मात्र शेळीपालनातून होणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत. तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही.बी. भोई आणि डॉ .एस. वाय. पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ग्रामीण भागात शेळीला आवश्यक असणारा चारा ब:यापैकी उपलब्ध आहे. त्यामुळे काही भागात अर्ध बंदिस्त तर काहींनी पूर्ण बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. ज्या भागात चारा उपलब्ध नाही ते बाहेरून चारा विकत आणून शेळी पाळत आहेत. मात्र पशु वैद्यकीय विभागाच्या वतीने शासकीय दराने चारा उपलब्ध करून दिल्यास निश्चितच आणखी काही तरुण या व्यवसायाकडे वळू शकतील असे मत तरूणांनी व्यक्त केल़े तालुका पशुवैद्यकीय डॉ. व्ही.बी. भोई आणि डॉ. एस. वाय. पाटील यांनी व्हॉट्स अपचा ग्रुप बनवला आहे. त्यावर शेळी पालनाबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच वेळोवेळी लसीकरण आणि औषधी कशा पद्धतीने द्याव्यात याचीही माहिती ग्रुपद्वारे दिली जाते.शेळी विकण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्रपणे बाजार नाही. बाजार समितीने पुढाकार घेऊन स्वतंत्र शेळी बाजार भरवला पाहिजे, व भावदेखील ठरवून दिला पाहिजे, ज्यामुळे  शेळी पालन करणा:या  व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही.शेळीपालन करणारे व्यावसायिक महेंद्र रामोशे आणि विनोद खैरनार (गंगापुरी), जालिंदर चौधरी व मच्छिंद्र चौधरी (गांधली), कपिल चौहान व अक्षय चौहान, अजापुत्र गोट फार्म, प्रदीप महाजन, महेश पाटील, लक्ष्मीकांत पाटील (सर्व अमळनेर), रामराव पाटील (जुनोने), गणेश पाटील (फाफोरे)े, अरुण पाटील, सतीलाल परदेशी, ज्ञानेश्वर पाटील (सर्व रंजाने), शिवा चौधरी (पळासदळे), दत्तात्रय बाविस्कर (रामेश्वर), गोरख चौधरी (गांधली),  अमोल राणे (दहिवद), संजय पाटील (जैतपीर), महेंद्र बोरसे, विलास पाटील, अनिल शिसोदे (डांगरी), विजय पाटील (रामेश्वर), दिनेश पाटील (खेडी),  रमण भदाणे (मंगरूळ) यांचा समावेश आहे. शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन केल्यास मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे शेतक:यांनी  या व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यांना पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.- डॉ. व्ही.बी. भोई, पशुवैद्यकीय अधिकारी, अमळनेर