शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

एका यात्रेतून दुसऱ्या यात्रेत दुकान मांडण्याआधीच काळाने घातला घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:37 IST

पारोळ््याजवळ महामार्गावर अपघातात दोघे चुलतभाऊ जागीच ठार : पिकअप व टँकरच्या धडकेत झाले होत्याचे नव्हते

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तुराटखेडे गावालगत पिकअप व टँकरची जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यातील मयत दोघेही एका यात्रेतून दुसऱ्या यात्रेत कटलरी साहित्याचे दुकान मांडण्यासाठी जात होते. मात्र, तिथे पोहचण्याआधीच त्यांच्यावर हा अनर्थ ओढवला.जळगाव येथील मासुमवाडी येथील रहीवासी शेख इक्बाल शेख ताहिर (वय २८), शेख आलताफ शेख वाहब (३२) हे दोघे चुलतभाऊ व त्यांच्यासोबत चालक वसिम पटेल (३०) हे तीन जण पिकअप वाहन (एमएच १५ ईव्ही २३८१)ने माहेजी येथून यात्रा आटोपून धुळे येथील रामबोरीस यात्रेत व्यवसायासाठी जात होते. राष्ट्रीय महामार्ग सहावर धुळ््याकडून येणारा टँकर (एमएच ४८, जे ५२२) हा पिकअप वाहनास जोराने धडकला. या अपघातात शेख इक्बाल, शेख अल्ताफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर टँकर चालक महेंद्र यादव (उत्तर प्रदेश) व पिकअप चालक वसिम पटेल (जळगाव) हे दोघ जखमी झाले आहेत.घटनेची माहिती कळताच रुगणवाहिका चालक ईश्वर ठाकुर, मुकेश ठाकुर यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मदत करीत अपघातातून मयतांना बाहेर काढले. कुटीर रुग्णालयात जखमी महेंद्र यादववर डॉ.योगेश साळुंखे व प्रशांत सोनवणे, डॉ.सुनिल पारोचे यांनी उपचार केले. सायंकाळी दोघांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात दिले.पारोळा पोलीस ठाण्यात मोहम्मद रफिक शेख शफी यांच्या फिर्यादीवरून टँकरचालक महेंद्र यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कॅबिनमधून ओढून काढलेहा अपघात एवढा भीषण होता की चालकासह हे दोन्ही मयत गाडीच्या कॅबिनमध्ये अडकून पडले. ग्रामस्थांनी त्यांना कॅबिन तोडून बाहेर काढले.अपघाताचे वृत्त कळताच नातेवाईकांनी थेट पारोळा कुटीर रुग्णालय गाठले. शेख अलताफ व मोहम्मद इकबाल यांचे मृतदेह पाहून एकच आक्रोश केला.

मूळ मासुमवाडी (जळगाव) येथील हे दोघे चुलत भाऊ कटलरीचे व पोळपाट, लाटणे विक्रीचे साहित्य आपल्या वाहनात घेऊन चालक वसीम पटेलसह खान्देशात जिथे जिथे यात्रा असेल त्या ठिकाणी दुकान लावत. या महिन्यात ६ यात्रा करून ते पाचोरा तालुक्यातील माहिजीची यात्रा आटोपून धुळे तालुक्यातील राम बोरीस यात्रेसाठी निघाले होते. पण त्या आधीच त्यांचा दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला. ते दोघेही गरीब कुटुंबातील होते. अपघातानंतर वाहनातील साहित्य रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते.

इकबालचे दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्नया अपघातात ठार झालेले अल्ताफ शेख वहाब मन्यार (वय ३२) व शेख इकबाल शेख ताहेर मन्यार (वय २७) दोन्ही एकमेकांचे नातेवाईक असून कासमवाडीला लागून असलेल्या हाजी अहमद नगरातील रहिवाशी होते. अल्ताफ याच्या पश्चातआई, वडील, पत्नी रहिनाबी, मुलगी सुफीया, फातिमा व मुलगा रेहान तर इकबाल याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते.आई, वडील, पत्नी रेहानबी व चार भाऊ असा परिवार आहे.