शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व

By admin | Updated: January 3, 2017 18:01 IST

. एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व येणार असल्याचे प्रतिपादन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांनी केले.

ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 3 - जमीन, कामगार, भांडवल आणि नौसर्गिक साधन संपत्ती या गोष्टी देशाच्या विकासासाठी आवश्यक ठरतात. स्वातंत्रपूर्व काळात भारतातून मोठया प्रमाणात कच्च्या मालाची निर्यात करुन इतर देशांनी विकास केला. स्वातंत्र्यानंतर भारतात औद्योगिकीकरणाला प्रारंभ झाला. १९९० नंतर देशाचा विकास हा गुंतवणूक किती केली जाते यावर मोजला जाऊ लागला. एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व येणार असल्याचे प्रतिपादन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांनी केले. विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन डॉ.शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी डॉ.शर्मा बोलत होते. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर स्पर्धेचे समन्वयक डॉ.ए.पी.डोंगरे, डॉ.एस.आर.चौधरी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.शर्मा म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारतात भौतिक आणि मानवी विकास आवश्यक आहे आणि त्यासाठी संशेधानाची गरज आहे.भौतिक आणि मानवी विकासातून देशाची प्रगती होत असते आणि त्यासाठी तरुणांच्या नवोन्मेष व नाविन्यपूर्ण अविष्काराची गरज असल्याचेडॉ.शर्मा म्हणाले. शाश्वत विकासाची गरजया देशाची परंपरा नव्या शोधाच्या अविष्काराची आहे. नवे संशोधन करताना पुढच्या पिढीसाठी सुलभ असणारे हवे, आवाहन निर्माण करणारे नको, शाश्वत विकासाचे संशोधन व्हावे अशी अपेक्षा डॉ.शर्मा यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सर्वसामान्य माणसाला, समाजाला आणि पयार्याने राष्ट्राला संशोधनाचा फायदा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. खान्देशातील विद्यार्थी ज्ञान आणि कौशल्यात मागे नाहीत असेही ते म्हणाले. प्रारंभ डॉ.एस.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. डॉ.अजय सुरवाडे यांनी आभार मानले. नाविन्यपूर्ण विषयांची हाताळणीस्पर्धेत विद्यार्थ्यांनी पोस्टर व मॉडेल अत्यंत नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. गाईच्या गोमुत्रापासून रंगाचे आयुष्य वाढविणे, इंडस्ट्रिजमध्ये जल शुध्दीकरण, ई-कचरा व्यवस्थापन, मेंदुच्या लहरी, जमीनीतील पाण्याचे तपासणी,महिला सबलीकरण, सर्वोत्तम गुंतवणूक, शेती अनुदान, सकारात्मकता आणि नकारात्मकता, तर्क क्षमता व समस्या, अध्यापन पध्दती, खान्देशातील आदिवासींचे योगदान, ग्रामीण विकास, ऐतिहासिक स्थळांची जतन, पारंपारिक साधनांची जतन, स्वच्छ भारत अभियान, मोबाईल वापर परिणाम, , विमुद्रीकरण, हायब्रीड एसी युनिट, नॅनो तंत्रज्ञान, मोडी भाषा हस्ताक्षर पध्दती, वॉटर हिटर या विषयांवर मॉडेल मांडले.