शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व

By admin | Updated: January 3, 2017 18:01 IST

. एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व येणार असल्याचे प्रतिपादन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांनी केले.

ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 3 - जमीन, कामगार, भांडवल आणि नौसर्गिक साधन संपत्ती या गोष्टी देशाच्या विकासासाठी आवश्यक ठरतात. स्वातंत्रपूर्व काळात भारतातून मोठया प्रमाणात कच्च्या मालाची निर्यात करुन इतर देशांनी विकास केला. स्वातंत्र्यानंतर भारतात औद्योगिकीकरणाला प्रारंभ झाला. १९९० नंतर देशाचा विकास हा गुंतवणूक किती केली जाते यावर मोजला जाऊ लागला. एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व येणार असल्याचे प्रतिपादन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांनी केले. विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन डॉ.शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी डॉ.शर्मा बोलत होते. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर स्पर्धेचे समन्वयक डॉ.ए.पी.डोंगरे, डॉ.एस.आर.चौधरी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.शर्मा म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारतात भौतिक आणि मानवी विकास आवश्यक आहे आणि त्यासाठी संशेधानाची गरज आहे.भौतिक आणि मानवी विकासातून देशाची प्रगती होत असते आणि त्यासाठी तरुणांच्या नवोन्मेष व नाविन्यपूर्ण अविष्काराची गरज असल्याचेडॉ.शर्मा म्हणाले. शाश्वत विकासाची गरजया देशाची परंपरा नव्या शोधाच्या अविष्काराची आहे. नवे संशोधन करताना पुढच्या पिढीसाठी सुलभ असणारे हवे, आवाहन निर्माण करणारे नको, शाश्वत विकासाचे संशोधन व्हावे अशी अपेक्षा डॉ.शर्मा यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सर्वसामान्य माणसाला, समाजाला आणि पयार्याने राष्ट्राला संशोधनाचा फायदा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. खान्देशातील विद्यार्थी ज्ञान आणि कौशल्यात मागे नाहीत असेही ते म्हणाले. प्रारंभ डॉ.एस.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. डॉ.अजय सुरवाडे यांनी आभार मानले. नाविन्यपूर्ण विषयांची हाताळणीस्पर्धेत विद्यार्थ्यांनी पोस्टर व मॉडेल अत्यंत नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. गाईच्या गोमुत्रापासून रंगाचे आयुष्य वाढविणे, इंडस्ट्रिजमध्ये जल शुध्दीकरण, ई-कचरा व्यवस्थापन, मेंदुच्या लहरी, जमीनीतील पाण्याचे तपासणी,महिला सबलीकरण, सर्वोत्तम गुंतवणूक, शेती अनुदान, सकारात्मकता आणि नकारात्मकता, तर्क क्षमता व समस्या, अध्यापन पध्दती, खान्देशातील आदिवासींचे योगदान, ग्रामीण विकास, ऐतिहासिक स्थळांची जतन, पारंपारिक साधनांची जतन, स्वच्छ भारत अभियान, मोबाईल वापर परिणाम, , विमुद्रीकरण, हायब्रीड एसी युनिट, नॅनो तंत्रज्ञान, मोडी भाषा हस्ताक्षर पध्दती, वॉटर हिटर या विषयांवर मॉडेल मांडले.