शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व

By admin | Updated: January 3, 2017 18:01 IST

. एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व येणार असल्याचे प्रतिपादन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांनी केले.

ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 3 - जमीन, कामगार, भांडवल आणि नौसर्गिक साधन संपत्ती या गोष्टी देशाच्या विकासासाठी आवश्यक ठरतात. स्वातंत्रपूर्व काळात भारतातून मोठया प्रमाणात कच्च्या मालाची निर्यात करुन इतर देशांनी विकास केला. स्वातंत्र्यानंतर भारतात औद्योगिकीकरणाला प्रारंभ झाला. १९९० नंतर देशाचा विकास हा गुंतवणूक किती केली जाते यावर मोजला जाऊ लागला. एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व येणार असल्याचे प्रतिपादन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांनी केले. विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन डॉ.शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी डॉ.शर्मा बोलत होते. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर स्पर्धेचे समन्वयक डॉ.ए.पी.डोंगरे, डॉ.एस.आर.चौधरी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.शर्मा म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारतात भौतिक आणि मानवी विकास आवश्यक आहे आणि त्यासाठी संशेधानाची गरज आहे.भौतिक आणि मानवी विकासातून देशाची प्रगती होत असते आणि त्यासाठी तरुणांच्या नवोन्मेष व नाविन्यपूर्ण अविष्काराची गरज असल्याचेडॉ.शर्मा म्हणाले. शाश्वत विकासाची गरजया देशाची परंपरा नव्या शोधाच्या अविष्काराची आहे. नवे संशोधन करताना पुढच्या पिढीसाठी सुलभ असणारे हवे, आवाहन निर्माण करणारे नको, शाश्वत विकासाचे संशोधन व्हावे अशी अपेक्षा डॉ.शर्मा यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सर्वसामान्य माणसाला, समाजाला आणि पयार्याने राष्ट्राला संशोधनाचा फायदा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. खान्देशातील विद्यार्थी ज्ञान आणि कौशल्यात मागे नाहीत असेही ते म्हणाले. प्रारंभ डॉ.एस.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. डॉ.अजय सुरवाडे यांनी आभार मानले. नाविन्यपूर्ण विषयांची हाताळणीस्पर्धेत विद्यार्थ्यांनी पोस्टर व मॉडेल अत्यंत नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. गाईच्या गोमुत्रापासून रंगाचे आयुष्य वाढविणे, इंडस्ट्रिजमध्ये जल शुध्दीकरण, ई-कचरा व्यवस्थापन, मेंदुच्या लहरी, जमीनीतील पाण्याचे तपासणी,महिला सबलीकरण, सर्वोत्तम गुंतवणूक, शेती अनुदान, सकारात्मकता आणि नकारात्मकता, तर्क क्षमता व समस्या, अध्यापन पध्दती, खान्देशातील आदिवासींचे योगदान, ग्रामीण विकास, ऐतिहासिक स्थळांची जतन, पारंपारिक साधनांची जतन, स्वच्छ भारत अभियान, मोबाईल वापर परिणाम, , विमुद्रीकरण, हायब्रीड एसी युनिट, नॅनो तंत्रज्ञान, मोडी भाषा हस्ताक्षर पध्दती, वॉटर हिटर या विषयांवर मॉडेल मांडले.