शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

२४ तासांच्या आत ८८ रुग्णांनी सोडला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्या ५३३ रुग्णांपैकी ८८ रुग्णांनी म्हणजे १६.५१ टक्के रुग्णांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्या ५३३ रुग्णांपैकी ८८ रुग्णांनी म्हणजे १६.५१ टक्के रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल होण्याच्या ६ ते २४ तासांच्या आत झालेला आहे. सुरुवातीच्या काळात रुग्णालयात उशिरा दाखल होणे, हे यामागील मुख्य कारण सांगितले जात आहे.

जिल्हाभरात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण हे सप्टेंबर महिन्यापर्यंत अतिशय गंभीर स्थितीत होते. त्यानंतर स्थानिक पातळीवर योग्य वैद्यकीय सुविधा सुरू झाल्यानंतर ही संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. अनेक दूरच्या गंभीर रुग्णांना थेट जळगावलाच दाखल करण्याशिवाय मध्यंतरी पर्याय नव्हता, त्यामुळे उशिरा रुग्णालयात येणाऱ्या व त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे अधिक आहे. सप्टेंबरनंतर कोविड रुग्णालयातील होणारे मृत्यू थांबले असून, आता दिवसाला सरासरी एक मृत्यूची नोंद होत आहे. बऱ्याच रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात पंधरा दिवस राहिल्यानंतरही झाला आहे. पारोळ्याच्या एका महिलेचा पंधरा दिवसांनंतर अहवाल निगेटिव्ह आलेला होता. मात्र, ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने अखेर या महिलेचा सोळाव्या दिवशी मृत्यू झाला होता.

असे आहेत मृत्यू

मृतावस्थेत ९

६ तासांच्या आधी ३९

६ ते २४ तासांच्या आत ८८

२४ ते ७२ तासांच्या आत १४९

७२ तासांपेक्षा अधिक कालावधीत २४९

तज्ज्ञ सांगतात ही पाच कारणे

१ रुग्णाला क्षयरोग असणे

२ रुग्णाला आधीच पक्षाघात असणे

३ तीव्र अस्थमा असणे

४ रुग्ण हिमोडायलिसिसवर असणे

५ अत्यंत गंभीरावस्थेत रुग्ण दाखल होणे

अशी विविध कारणे २४ तासांच्या आत मृत्यूला कारणीभूत असू शकतात, असे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

महिलांपेक्षा पुरुषांना मृत्यूचा अधिक धोका

मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे या मृत्यूंच्या विश्लेषणाने समोर आले आहे. या ५३३ मृत्यूंपैकी ३५४ पुरुष तर १७९ महिलांचा समावेश आहे. तज्ज्ञांकडून जाणून घेतले असता, पुरुष वातावरणात एक्सपोज होतात, म्हणजेच त्यांचा महिलांपेक्षा बाहेरच्या वातावरणाशी, गर्दीशी अधिकचा संबंध येत असतो. शिवाय धूम्रपान, मद्यपान याचे प्रमाणही पुरुषांमध्ये अधिक असते. त्यामुळे त्यांची प्रतिकारक्षमता कमी होते. त्यामुळे महिलांपेक्षा पुरुषांचे मृतांमध्ये प्रमाण अधिक असल्याची ही कारणे असू शकतात, अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली.