शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळ्यांचा लिलावच होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:37 IST

प्रशासनाची ठाम भूमिका : पुढील महासभेत प्रशासनाकडून सादर होणार प्रस्ताव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अनेक वर्षांपासून थकीत असलेला ...

प्रशासनाची ठाम भूमिका : पुढील महासभेत प्रशासनाकडून सादर होणार प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अनेक वर्षांपासून थकीत असलेला मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न आता निकाली काढण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मनपा प्रशासनाने नुकसानभरपाईची नोटीस बजावली होती. मात्र, तीन महिन्यात एकाही गाळेधारकाने ही रक्कम न भरल्याने आता मनपाकडून थेट गाळे लिलाव करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, प्रशासनाची पूर्ण तयारी झाल्याची माहिती मनपा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच याबाबतीत सत्ताधारी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानेदेखील दुजोरा दिला आहे.

मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न २०१२ पासून प्रलंबित आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गाळेधारकांनी न्यायालयातदेखील दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने मनपाच्या बाजूने निर्णय देत, गाळेधारकांकडे असलेले थकीत भाडे वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या वर्षी मनपा प्रशासनाने काही गाळेधारकांकडून ८५ कोटींची वसुली केली होती. ज्या गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली आहे. अशा गाळेधारकांचे गाळे नूतनीकरण करून देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जात होती. मात्र, हे नियमात नसल्याचे सांगत आता प्रशासनाने थकीत भाडे भरणाऱ्या १२६ गाळेधारकांसोबत इतर मार्केटमधील गाळेधारकांचे गाळे आता लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मनपा आयुक्तांकडे झालेल्या अधिकाऱ्यांचा बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, प्रशासन आता आक्रमक झाल्याचेही बोलले जात आहे.

सत्ताधाऱ्यांचाही छुपा पाठिंबा

१. गाळेधारकांबाबत सत्ताधारी भाजपने समर्थनाचीच भूमिका घेतली आहे. तसेच गाळेधारकांचे व मनपाचेही हीत जोपासले जाईल यासाठी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी व आमदार सुरेश भोळे हेदेखील आग्रही आहेत. मात्र, अनेक बैठका घेऊन व अधिनियमात बदल करूनदेखील गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लागताना दिसून येत नाही.

२. त्यातच शहरातील प्रमुख समस्या ही रस्त्यांची झाली आहे. रस्त्यांच्या समस्येवरून सत्ताधारी भाजपच्या विरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत शहरातील नवीन रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून निधीदेखील मिळत नाही. त्यामुळे शहरातील रस्ते आता मनपा फंडातूनच तयार केले जाणार आहेत.

३. मनपाकडेदेखील पुरेसा निधी नसल्याने गाळेधारकांकडून वसुली करण्याशिवाय मनपाला पर्याय नाही. रस्त्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजपबद्दल असलेला संताप टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा भर गाळे कारवाई थांबविण्यापेक्षा रस्त्यांवर असल्याने सत्ताधाऱ्यांनीदेखील गाळेधारकांच्या निर्णयाबाबत प्रशासनाला मोकळीक दिल्याची माहिती भाजपतील बड्या पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

४. गाळे कारवाईत जर मनपाला १०० कोटी रुपयांची वसुली करता आली तरीही शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही मनपा प्रशासनाला याबाबतीत खुली सूट दिल्याचीही माहिती मनपातील सूत्रांनी दिली आहे.

नूतनीकरण होणे कठीण

सत्ताधारी भाजपतील काही नगरसेवक गाळे नूतनीकरणासाठी आग्रही होते. मात्र, सद्यस्थितीत असलेले अनेक गाळेधारक हे पोटभाडेकरू असून, अनेकांनी लिलावानुसार गाळे भाड्यात घेतलेले नाहीत. त्यातच न्यायालयाचा निर्णय, अशा अनेक कायदेशीर बाबींमुळे गाळ्यांचे नूतनीकरण होणे कठीण आहे. मनपाने काही १३ गाळे काही वर्षांपूर्वी सील केले होते. याच गाळ्यांचा लिलाव पहिल्या टप्प्यात केला जाणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.