शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोरोनाच्या आपत्तीला आता तरी आळा बसेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

पाच महिन्यांपासून संसर्ग कमी होऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असतानाच गर्दी ...

पाच महिन्यांपासून संसर्ग कमी होऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असतानाच गर्दी वाढू लागल्याने व नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाने पुन्हा आता डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा आता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाला आहेत. यात पाच ते सहा दिवसांपासून आवाहन केले जात आहे, मात्र लग्नांच्या ठिकाणी गर्दी टाळ‌ावी, मास्कचा वापर करावा अशा साध्या-साध्या नियमांचे पालन होत नसल्याने गेल्या वर्षाप्रमाणे आता पुन्हा आदेशांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत असले तरी नियमांचे पालन होत नसल्यास उपाययोजनांचा उपयोग होणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासन उपाययोजना करीत असल्याने आता तरी नागरिकांची साथ मिळून कोरोनाच्या आपत्तीला आळा बसू शकेल की नाही, हे नियम पाळण्यावरच अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यात लग्नाच्या ठिकाणी गर्दी होऊ लागल्याने व कोरोनाचे गांभीर्य नसल्याने रविवारी तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून धडक कारवाईचे सत्र सुरू केले. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसू शकेल. जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्यामुळे आता आदेशांचेही सत्र सुरू झाले असून या पाठोपाठ आता कठोर प्रशासकीय उपाययोजना जाहीर केल्यामुळे कोरोनाच्या आपत्तीलाही आळा बसू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.