शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कोरोनाच्या आपत्तीला आता तरी आळा बसेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

पाच महिन्यांपासून संसर्ग कमी होऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असतानाच गर्दी ...

पाच महिन्यांपासून संसर्ग कमी होऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असतानाच गर्दी वाढू लागल्याने व नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाने पुन्हा आता डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा आता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाला आहेत. यात पाच ते सहा दिवसांपासून आवाहन केले जात आहे, मात्र लग्नांच्या ठिकाणी गर्दी टाळ‌ावी, मास्कचा वापर करावा अशा साध्या-साध्या नियमांचे पालन होत नसल्याने गेल्या वर्षाप्रमाणे आता पुन्हा आदेशांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत असले तरी नियमांचे पालन होत नसल्यास उपाययोजनांचा उपयोग होणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासन उपाययोजना करीत असल्याने आता तरी नागरिकांची साथ मिळून कोरोनाच्या आपत्तीला आळा बसू शकेल की नाही, हे नियम पाळण्यावरच अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यात लग्नाच्या ठिकाणी गर्दी होऊ लागल्याने व कोरोनाचे गांभीर्य नसल्याने रविवारी तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून धडक कारवाईचे सत्र सुरू केले. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसू शकेल. जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्यामुळे आता आदेशांचेही सत्र सुरू झाले असून या पाठोपाठ आता कठोर प्रशासकीय उपाययोजना जाहीर केल्यामुळे कोरोनाच्या आपत्तीलाही आळा बसू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.