शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST

सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने ७ जूनपासून अनलॉक केल्यानंतर महामंडळातर्फे लांब पल्ल्याच्या बसेससह रातराणी सेवादेखील सुरू ...

सचिन देव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने ७ जूनपासून अनलॉक केल्यानंतर महामंडळातर्फे लांब पल्ल्याच्या बसेससह रातराणी सेवादेखील सुरू केली आहे. तर गेल्या आठवड्यापासून परराज्यातही सेवा सुरू केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू न केल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. बससेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी बसने जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.

`गाव तेथे एसटी बस` असे एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. कोरोनापूर्वी या वाक्यानुसार प्रत्येक गाव आणि वाडी वस्त्यांवर बसेस धावायच्यादेखील. मात्र, कोरोनामुळे ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. जळगाव आगारातर्फे अनलॉक झाल्यापासून पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, माहूरगड या मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच गेल्या आठवड्यापासून प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असतानाही, गुजरात मार्गावर बससेवा सुरू केली आहे. मात्र, तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अद्यापही बससेवा सुरू न झाल्यामुळे या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

इन्फो :

आगारातील एकूण बसेस - ८०

कोरोनाआधी होणाऱ्या दररोज फेऱ्या - ४५०

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या -२५०

इन्फो :

खेडेगावात जाण्यासाठी ‘खासगी रिक्षांचा`चा आधार

महामंडळातर्फे अनलॉक झाल्यानंतरही ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू न केल्यामु‌ळे, येथील नागरिकांना शहरात येण्यासाठी खासगी रिक्षांचाच आधार घ्यावा लागत आहे. जळगाव तालुक्यातील असोदा, वडली, आव्हाणे, रायपूर, नशिराबाद, शिरसोली या ठिकाणी असणारे नागरिकांना खासगी प्रवासी वाहनांनी शहरात यावे लागत आहे. यासाठी त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

इन्फो :

१० लाख किमी प्रवास, पण फक्त शहराचाच :

जळगाव आगारातर्फे सरासरी सध्या २५ ते ३० हजार किलोमीटरपर्यंत बसेस चालविण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात अनलॉक झाल्यानंतर जळगाव आगारातून पाच लाख किलोमीटरपर्यंत बसेस चालविण्यात आल्या तर आता जुलै महिन्यात १६ जुलैपर्यंत पाच लाख किलोमीटरच्या वर बसेस चालविण्यात आलेल्या आहेत. या सर्व बसेस शहरी मार्गावरच चालविण्यात आल्या आहेत. यातून महामंडळाला साडेतीन कोटींच्या घरात आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. तर सध्या उत्पन्नात जळगाव आगाराच आघाडीवर आहे.

इन्फो :

खेडेगावावरच अन्याय का?

ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांकडे स्वत:ची वाहने नसल्यामुळे त्यांना शहरात येण्यासाठी एसटी बस हा एकच चांगला पर्याय असतो. मात्र, कोरोनाचे कारण सांगून, महामंडळातर्फे अद्यापही ग्रामीण भागात सेवा सुरू न केल्यामुळे, खूप हाल होत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांना जादा पैसे मोजून शहरात यावे लागत आहे.

किशोर चौधरी, आसोदा

इन्फो :

बससेवा बंद असल्यामुळे शहरात येण्यासाठी खासगी वाहनांचाच एक पर्याय असतो. त्यात खासगी वाहनांना जादा भाडे मोजावे लागते. त्यामुळे महामंडळाने प्रवाशांच्या गैरसोयीचा व सुरक्षेचा विचार करून, तात्काळ ग्रामीण भागातील बससेवा सुरू करावी.

हर्षल पाटील, आव्हाणे

इन्फो :

जळगाव आगारातर्फे गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. सध्या शाळा-महाविद्यालय बंद असल्याने, ग्रामीण भागातील सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाही. शाळा सुरू झाल्यावर प्रत्येक गावांना बसेस सोडण्यात येतील. तर आताही टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करत आहोत.

नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार