शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

सचिन देव जळगाव : कोरोनाचे टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल झाल्यानंत रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्यात स्थगित केलेल्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात ...

सचिन देव

जळगाव : कोरोनाचे टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल झाल्यानंत रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्यात स्थगित केलेल्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहे. सद्य:स्थितीला पॅसेंजर वगळता ८० टक्के एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. १५ ऑगस्टपासून शासनाने मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, भुसावळ विभागातील पॅसेंजर सेवा अद्यापही बंदच आहे. पॅसेंजर सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. अनलॉक नंतरही पॅसेंजर बंद का? असा प्रश्न चाकरमानी व प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो:

बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे

भुसावळ-देवळाली पॅसेंजर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, भुसावळ-अमरावती पॅसेंजर, भुसावळ-नागपूर पॅसेंजर, भुसावळ-बडनेरा पॅसेंजर, चाळीसगाव- धुळे पॅसेंजर सध्या बंद आहेत.

इन्फो :

बंद असलेल्या एक्स्प्रेस

रेल्वे प्रशासनाने जूनपासून टप्प्या-टप्प्याने ८० टक्के रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. फक्त हुतात्मा एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस या दोनच गाड्या सध्या बंद ठेवल्या आहेत, तर या गाड्या कधी सुरू होणार, याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

इन्फो :

सुरू असलेल्या एक्स्प्रेस

काशी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस आदी सुपरफास्ट गाड्या सध्या सुरू आहेत. मात्र, या गाड्यांना जनरल तिकीट बंद ठेवण्यात आले आहे.

इन्फो :

रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना

कोरोनामुळे रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या वर्षांपासून पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे सध्या ज्या स्पेशल व विशेष गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे. मात्र, या गाड्यांना तिकीट दर हा जास्त असल्याने प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता अनलॉकनंतर पॅसेंजर गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.

संदीप पाटील, प्रवासी

कोरोनाचे कारण सांगून रेल्वे प्रशासनाने सर्वत्र अनलॉक झाल्यानंतरही पॅसेंजर बंद ठेवल्या आहेत. इतर गाड्या सुरू असताना पॅसेंजर गाड्या बंद का? रेल्वे प्रशासनाचे हे धोरण समजत नाही. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून, याबाबत स्थानिक खासदार-आमदारांचेही दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे, तर सध्याच्या स्पेशल गाड्यांच्या नावाने जादा तिकीट आकारून रेल्वे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड देत आहे.

संजय येवले, प्रवासी

इन्फो :

तर राज्य शासनाच्या आदेशानंतर पॅसेंजर सुरू होणार

अनलॉकनंतरही पॅसेंजर गाड्या सुरू होत नसल्याबाबत `लोकमत` प्रतिनिधीने भुसावळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी पॅसेंजर सुरू करण्याला राज्य शासनाची परवानगी नाही. राज्य शासन जेव्हा परवानगी देईल, तेव्हाच पॅसेंजर सेवा सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.