शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

सचिन देव जळगाव : कोरोनाचे टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल झाल्यानंत रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्यात स्थगित केलेल्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात ...

सचिन देव

जळगाव : कोरोनाचे टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल झाल्यानंत रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्यात स्थगित केलेल्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहे. सद्य:स्थितीला पॅसेंजर वगळता ८० टक्के एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. १५ ऑगस्टपासून शासनाने मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, भुसावळ विभागातील पॅसेंजर सेवा अद्यापही बंदच आहे. पॅसेंजर सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. अनलॉक नंतरही पॅसेंजर बंद का? असा प्रश्न चाकरमानी व प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो:

बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे

भुसावळ-देवळाली पॅसेंजर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, भुसावळ-अमरावती पॅसेंजर, भुसावळ-नागपूर पॅसेंजर, भुसावळ-बडनेरा पॅसेंजर, चाळीसगाव- धुळे पॅसेंजर सध्या बंद आहेत.

इन्फो :

बंद असलेल्या एक्स्प्रेस

रेल्वे प्रशासनाने जूनपासून टप्प्या-टप्प्याने ८० टक्के रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. फक्त हुतात्मा एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस या दोनच गाड्या सध्या बंद ठेवल्या आहेत, तर या गाड्या कधी सुरू होणार, याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

इन्फो :

सुरू असलेल्या एक्स्प्रेस

काशी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस आदी सुपरफास्ट गाड्या सध्या सुरू आहेत. मात्र, या गाड्यांना जनरल तिकीट बंद ठेवण्यात आले आहे.

इन्फो :

रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना

कोरोनामुळे रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या वर्षांपासून पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे सध्या ज्या स्पेशल व विशेष गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे. मात्र, या गाड्यांना तिकीट दर हा जास्त असल्याने प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता अनलॉकनंतर पॅसेंजर गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.

संदीप पाटील, प्रवासी

कोरोनाचे कारण सांगून रेल्वे प्रशासनाने सर्वत्र अनलॉक झाल्यानंतरही पॅसेंजर बंद ठेवल्या आहेत. इतर गाड्या सुरू असताना पॅसेंजर गाड्या बंद का? रेल्वे प्रशासनाचे हे धोरण समजत नाही. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून, याबाबत स्थानिक खासदार-आमदारांचेही दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे, तर सध्याच्या स्पेशल गाड्यांच्या नावाने जादा तिकीट आकारून रेल्वे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड देत आहे.

संजय येवले, प्रवासी

इन्फो :

तर राज्य शासनाच्या आदेशानंतर पॅसेंजर सुरू होणार

अनलॉकनंतरही पॅसेंजर गाड्या सुरू होत नसल्याबाबत `लोकमत` प्रतिनिधीने भुसावळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी पॅसेंजर सुरू करण्याला राज्य शासनाची परवानगी नाही. राज्य शासन जेव्हा परवानगी देईल, तेव्हाच पॅसेंजर सेवा सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.