शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद, व्यावसायीक प्रशिक्षण देणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम(एमसीव्हीसी) बंद करण्याचे परिपत्रक शासनाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम(एमसीव्हीसी) बंद करण्याचे परिपत्रक शासनाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चार शासकीय संस्था या आयटीआयकडे वर्ग केल्या जाणार आहे. त्यामुळे आता या व्यावसायीक प्रशिक्षणाचे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. एकीकडे सरकार मुलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणार असल्याची भूमिका आग्रहाने मांडत आहे. तर त्याचसोबत ही यंत्रणा बंद केली जात असल्याने विद्यार्थ्यामध्ये नाराजी पसरली आहे.

१९८८ च्या सुमारास केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्य शासनाने व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन जास्तीत जास्त युवकांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी राज्यात हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार सध्या राज्यातील ५३ आणि जिल्ह्यातील शासकीय ४ संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र हा अभ्यासक्रम आता बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय संस्था या जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे होत आहे नुकसान

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एम.सी.व्ही.सी) हा बंद करण्यात आला आहे. या अंतर्गत सध्या जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही त्याची अखेरची बॅच असेल. आता यंदा नवीन विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळणार नाही. त्यात दोन उपशाखा असतात. त्यात एक तांत्रिक आणि दुसऱ्या शाखेत तांत्रिक अभ्यास नसतो. त्यासोबतच इतर संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी एक अतिरिक्त पर्यायी विषय म्हणून याची निवड करु शकतात. आता पुढे ज्यासंस्थांचे विद्यार्थी या चार तांत्रिक विद्यालयांमध्ये शिकत होते. त्यांना या व्यवसाय शिक्षणाला मुकावे लागु शकते. काॅम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या सोबत इतर विषयही त्यात शिकवले जात आहेत.

कोट - हा अभ्यासक्रम सरकारला चालवायचा नसेल तर त्यांनी तो किमान बंद तरी करावा. हा अभ्यासक्रम चालवतांना त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. आणि संस्था चालकांनाही दिशा मिळत नाही. अनुदानितचा शिक्षक वर्ग निवृत्त झाला आहे. आता हा अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्वावर चालवला जात आहे. यातील काही विषयांचा विद्यार्थ्यांना खरोखरच फायदा होतो. त्यामुळे हे विद्यार्थी नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकतात. तर काही विषयांचा विद्यार्थ्यांना फारसा फायदा होत नाही. - नंदकुमार बेंडाळे, अध्यक्ष, केसीई सोसायटी.

विद्यार्थी कोट

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या यात फक्त शासकीय संस्था बंद होणार आहे. त्यामुळे पुढे प्रवेश मिळणार नाही. ज्यांनी आधी प्रवेश घेतला होता. त्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा झाला आहे. - अनुप सोनवणे, विद्यार्थी

हा अभ्यासक्रम बंद झाला आहे. त्यामुळे आता नंतरच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळणार नाही. तसेच त्यांना पुढच्या काळात पर्यायी विषय देखील घेता येणार नाही. त्यांना शासकीय नाही तर इतर संस्थांमध्ये हा विषय घेऊन शिकावे लागेल. - आनंद पाटील, विद्यार्थी

आकडेवारी

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यातील संस्था

शासकीय - ४

अनुदानित - ५२

विनाअनुदानित - १

एकुण प्रवेश क्षमता - ५५८०