शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

रिक्षाचालकांच्या गुंडगिरीला लगाम घालणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST

सुनील पाटील जळगाव : गेल्या काही दिवसापासून शहरात रिक्षाचालकांची गुंडगिरी वाढली आहे. रिक्षाच्या व्यवसायाच्या नावाखाली काही जणांनी प्रवाशांना मारहाण ...

सुनील पाटील

जळगाव : गेल्या काही दिवसापासून शहरात रिक्षाचालकांची गुंडगिरी वाढली आहे. रिक्षाच्या व्यवसायाच्या नावाखाली काही जणांनी प्रवाशांना मारहाण करून लुटण्याचा उद्योगच सुरू केलेला आहे. काही मोजक्या गुंडगिरी करणाऱ्या या रिक्षाचालकांमुळे इतर रिक्षाचालक, मालक बदनाम होत आहेत. शहरात काही जणांनी तर टोळ्याच निर्माण केलेल्या आहेत. छेडखानीच्या प्रकारामुळे महिलांमध्येदेखील असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.

एकीकडे दिवसभर राबून प्रामाणिपणे दोन-चारशे रुपये कमवून सुखाने दोन घास खाणारे काही रिक्षाचालक आहेत तर दुसरीकडे संध्याकाळी दारू व मौजमस्तीच्या सोयीसाठी प्रवाशांना लुटणारे आहेत. काही जणांनी तर गुन्हेगारी कृत्यासाठीच रिक्षाचा वापर सुरू केलेला आहे. जामनेर येथील एका व्यापाऱ्याला गेल्या पंधरवाड्यात मारहाण करून लुटण्यात आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. शनिपेठ पोलिसांनीदेखील काही महिन्यापूर्वी परप्रांतीय वृद्धाला लुटणाऱ्या रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांना अटक केली होती. दरम्यान, प्रवाशांना विश्वास व दिलासा देण्यासाठी या प्रवृत्तींना ठेचणे गरजेचे असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

विनापरवाना रिक्षाचालक एक डोकेदुखी

शहरात निम्म्यापेक्षा जास्त रिक्षा चालकांकडे परवाना नाही. काही रिक्षांची मुदतच संपलेली आहे, तर काही जणांकडे ना बॅच ना बिल्ला अशी स्थिती आहे. काही वर्षांपूर्वी विनापरवानाधारक रिक्षांवर पोलिसांनी कारवाई केली होती. तेव्हा संघटनांनी आंदोलन केले होते. आज अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे कार्य करतात. प्रवाशांशी सौजन्याने वागतात तर काहीजण पुरुषच नाही तर महिलांशीही उध्दटपणाने वागतात, त्यांच्या या कृतीमुळे सर्वच रिक्षाचालक बदनाम होत असून ही एक डोकेदुखीच वाढलेली आहे.