शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजाराला अभय कोणाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

मुदत संपूनही, ठराव होऊनही कारवाई नाही : वर्षानुवर्षे पडलेल्या जुन्या विषयांकडे मनपाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका ...

मुदत संपूनही, ठराव होऊनही कारवाई नाही : वर्षानुवर्षे पडलेल्या जुन्या विषयांकडे मनपाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका मालकीच्या कोट्यवधींच्या जागा धूळ खात पडल्या असून, अनेक जागांची मुदत संपून देखील मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या जागा ताब्यात घेतल्या गेलेल्या नाहीत. मनपा प्रशासनाची निम्मी शक्ती शहरातील हॉकर्सवर कारवाई करण्यात खर्च होत असताना, मोठ्या व कोट्यवधींच्या जागांकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

अजिंठा चौकातील भंगार बाजारातील दुकानांची मुदत अनेक वर्षांपूर्वी संपली असून, ही जागा ताब्यात घेण्याचा ठराव देखील मनपाने दिला आहे. मात्र, मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे हा बाजार ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबलेली आहे.

मनपा प्रशासनाकडून ही कोट्यवधीची जागा ताब्यात घेण्याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. हॉकर्सवर कारवाई होऊ शकते, वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, तर मग भंगार बाजाराची जागा मनपा मालकीची असताना देखील कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मनपाने रितसर ठराव केला आहे. न्यायालयाचाही कोणताही अडथळा या प्रकरणात नाही. असे असतानाही मनपा प्रशासनाला याठिकाणी कारवाई करण्यास काय हरकत आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनपा प्रशासन नेमक्या कोणत्या दबावात आहे? याचे उत्तर देखील मनपा प्रशासनाने देण्याची गरज आहे.

काय आहे प्रकरण...

१. जळगाव शहरातील अजिंठा चौकात महापालिका मालकीची जागा भंगार बाजाराला देण्यात आली आहे. जळगाव शहरातून अजिंठा चौकात जाताना डाव्या बाजूला असलेला भंगार बाजार ही जागा महापालिकेची आहे. मात्र, अनेक वर्षापासून ही जागा भंगार बाजारासाठी वापरली जात आहे.

२. ११७ जणांना ही जागा २ रुपये व १५ रुपये वार्षिक भाड्याने देण्यात आली होती. या जागेचा भाडे करार देखील संपला आहे. तसेच भंगार बाजारामुळे वाहतुकीस देखील अडथळा होत आहे.

३. भंगार बाजाराची ही ९० हजार स्क्वेअर फूट जागा असून, आजच्या बाजारमूल्याप्रमाणे या जागेची रक्कम १० कोटींपेक्षा जास्त आहे. ही जागा ताब्यात घेण्याबाबत फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या महासभेत देखील ठराव करण्यात आला होता.

कोट्यवधींची जागा धूळ खात अन् निधीसाठी मंत्र्यांना साकडे

महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन हेच कारण पुढे करत शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्याच्या मुद्द्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न करते. एकीकडे महापालिका मालकीच्या कोट्यवधींच्या जागा धूळ खात पडलेल्या आहेत. त्या जागा ताब्यात घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही मनपा करत नाही अन् दुसरीकडे मंत्र्यांकडे निधीसाठी साकडे घातले जाते. जर मनपाने स्वमालकीच्या जागा ताब्यात घेतल्या, तर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन मनपाला शासनाकडे निधी मागण्याचीही गरज पडणार नाही. मात्र, मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे व कारवाई करण्याची हिंमत नसल्याने मनपा प्रशासनावर ही वेळ आली आहे.