शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

भंगार बाजाराला अभय कोणाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

मुदत संपूनही, ठराव होऊनही कारवाई नाही : वर्षानुवर्षे पडलेल्या जुन्या विषयांकडे मनपाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका ...

मुदत संपूनही, ठराव होऊनही कारवाई नाही : वर्षानुवर्षे पडलेल्या जुन्या विषयांकडे मनपाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका मालकीच्या कोट्यवधींच्या जागा धूळ खात पडल्या असून, अनेक जागांची मुदत संपून देखील मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या जागा ताब्यात घेतल्या गेलेल्या नाहीत. मनपा प्रशासनाची निम्मी शक्ती शहरातील हॉकर्सवर कारवाई करण्यात खर्च होत असताना, मोठ्या व कोट्यवधींच्या जागांकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

अजिंठा चौकातील भंगार बाजारातील दुकानांची मुदत अनेक वर्षांपूर्वी संपली असून, ही जागा ताब्यात घेण्याचा ठराव देखील मनपाने दिला आहे. मात्र, मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे हा बाजार ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबलेली आहे.

मनपा प्रशासनाकडून ही कोट्यवधीची जागा ताब्यात घेण्याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. हॉकर्सवर कारवाई होऊ शकते, वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, तर मग भंगार बाजाराची जागा मनपा मालकीची असताना देखील कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मनपाने रितसर ठराव केला आहे. न्यायालयाचाही कोणताही अडथळा या प्रकरणात नाही. असे असतानाही मनपा प्रशासनाला याठिकाणी कारवाई करण्यास काय हरकत आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनपा प्रशासन नेमक्या कोणत्या दबावात आहे? याचे उत्तर देखील मनपा प्रशासनाने देण्याची गरज आहे.

काय आहे प्रकरण...

१. जळगाव शहरातील अजिंठा चौकात महापालिका मालकीची जागा भंगार बाजाराला देण्यात आली आहे. जळगाव शहरातून अजिंठा चौकात जाताना डाव्या बाजूला असलेला भंगार बाजार ही जागा महापालिकेची आहे. मात्र, अनेक वर्षापासून ही जागा भंगार बाजारासाठी वापरली जात आहे.

२. ११७ जणांना ही जागा २ रुपये व १५ रुपये वार्षिक भाड्याने देण्यात आली होती. या जागेचा भाडे करार देखील संपला आहे. तसेच भंगार बाजारामुळे वाहतुकीस देखील अडथळा होत आहे.

३. भंगार बाजाराची ही ९० हजार स्क्वेअर फूट जागा असून, आजच्या बाजारमूल्याप्रमाणे या जागेची रक्कम १० कोटींपेक्षा जास्त आहे. ही जागा ताब्यात घेण्याबाबत फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या महासभेत देखील ठराव करण्यात आला होता.

कोट्यवधींची जागा धूळ खात अन् निधीसाठी मंत्र्यांना साकडे

महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन हेच कारण पुढे करत शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्याच्या मुद्द्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न करते. एकीकडे महापालिका मालकीच्या कोट्यवधींच्या जागा धूळ खात पडलेल्या आहेत. त्या जागा ताब्यात घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही मनपा करत नाही अन् दुसरीकडे मंत्र्यांकडे निधीसाठी साकडे घातले जाते. जर मनपाने स्वमालकीच्या जागा ताब्यात घेतल्या, तर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन मनपाला शासनाकडे निधी मागण्याचीही गरज पडणार नाही. मात्र, मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे व कारवाई करण्याची हिंमत नसल्याने मनपा प्रशासनावर ही वेळ आली आहे.