शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST

सुनील पाटील जळगाव : उद्याचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हातात आज पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा ...

सुनील पाटील

जळगाव : उद्याचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हातात आज पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा आला. हे विदारक चित्र शहरातील मुख्य मार्ग व बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. खासकरून नवीन गोलाणी मार्केट परिसर, बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, रेल्वेस्थानक, बी.जे. मार्केटसह सिग्नलवर पाहावयास मिळत आहे. या निरागस बालकांना भीक मागण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडूनही बळ मिळत असल्याचे वास्तव आहे.

भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार राज्यात औरंगाबादसह अनेक ठिकाणी उघडकीस आला. जळगावात लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे वास्तव आहे. हॉटेल, नास्त्याची गाडी तसेच गर्दीच्या ठिकाणी मुले भीक मागतात आणि आई-वडील पैसे गोळा करताना दिसतात. शासनाकडून विशिष्ट समुदायासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, योजनादेखील आहेत. मात्र, निरक्षरता, अज्ञान, व्यसन, दारिद्र्य यामुळे विशिष्ट समुदायातील ही मुले भीक मागतात आणि भावी जीवनात ते वाममार्गाला लागत असल्याचे अनेक उदाहरण आहेत. जळगाव शहरात कमी वयातील मुले व्यसनेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.

मंदिराचे ओटे, तलाव परिसरात वास्तव्य

भीक मागणारे पालक व मुले हे सर्वाधिक मेहरुण तलाव परिसरात झोपड्यांमध्ये वास्तव्याला असल्याचे दिसून येतात. त्याशिवाय नवीन, जुने बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, सुभाष चौक, रेल्वेस्थानक, बी.जे. मार्केट भागात भीक मागणारी मुले रात्री त्याच भागात आई-वडिलांसह वास्तव्य करीत असल्याचे दिसून येतात. गायत्री मंदिराच्या ओट्यावरदेखील काही मुलांचे वास्तव्य दिसून आले. महामार्गदेखील भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहे. रात्रीला उघड्यावर विश्रांती आणि दिवसा भीक मागणे, हा त्यांचा शिरस्ता आहे.

बाहेर जिल्ह्यातील अनेक कुटुंब

जळगाव शहरात भीक मागणाऱ्या मुलांमध्ये अनेक जण बाहेर जिल्ह्यातील व आदिवासी भागातील असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या काळातदेखील अनेक जणांनी जळगावात आश्रय घेतला. भीक मागून उपजीविका भागविणे ही नित्याचीच बाब झाली आहे. भीक मागणारे बालक जिल्ह्यातील विविध भागातील आहेत. मात्र, ना शिक्षण, ना सामाजिक भान, अशीच त्यांची स्थिती आहे.

बालहक्क कोण मिळवून देणार?

रेल्वे स्टेशन परिरसरात भीक मागणाऱ्या २०१९ मुलांना समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत २५ राज्यात त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. भीक मागणारी काही मुले पोलीस सहकार्य व बाल कल्याण समितीच्या आदेशाने ताब्यात घेऊन बालगृहात ठेवण्यात आले होते. जळगाव व भुसावळात बालसंस्कार वर्ग सुरू करण्यात आले आहे.

-सपना श्रीवास्तव, समन्वयक, समतोल प्रकल्प