शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST

सुनील पाटील जळगाव : उद्याचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हातात आज पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा ...

सुनील पाटील

जळगाव : उद्याचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हातात आज पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा आला. हे विदारक चित्र शहरातील मुख्य मार्ग व बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. खासकरून नवीन गोलाणी मार्केट परिसर, बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, रेल्वेस्थानक, बी.जे. मार्केटसह सिग्नलवर पाहावयास मिळत आहे. या निरागस बालकांना भीक मागण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडूनही बळ मिळत असल्याचे वास्तव आहे.

भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार राज्यात औरंगाबादसह अनेक ठिकाणी उघडकीस आला. जळगावात लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे वास्तव आहे. हॉटेल, नास्त्याची गाडी तसेच गर्दीच्या ठिकाणी मुले भीक मागतात आणि आई-वडील पैसे गोळा करताना दिसतात. शासनाकडून विशिष्ट समुदायासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, योजनादेखील आहेत. मात्र, निरक्षरता, अज्ञान, व्यसन, दारिद्र्य यामुळे विशिष्ट समुदायातील ही मुले भीक मागतात आणि भावी जीवनात ते वाममार्गाला लागत असल्याचे अनेक उदाहरण आहेत. जळगाव शहरात कमी वयातील मुले व्यसनेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.

मंदिराचे ओटे, तलाव परिसरात वास्तव्य

भीक मागणारे पालक व मुले हे सर्वाधिक मेहरुण तलाव परिसरात झोपड्यांमध्ये वास्तव्याला असल्याचे दिसून येतात. त्याशिवाय नवीन, जुने बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, सुभाष चौक, रेल्वेस्थानक, बी.जे. मार्केट भागात भीक मागणारी मुले रात्री त्याच भागात आई-वडिलांसह वास्तव्य करीत असल्याचे दिसून येतात. गायत्री मंदिराच्या ओट्यावरदेखील काही मुलांचे वास्तव्य दिसून आले. महामार्गदेखील भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहे. रात्रीला उघड्यावर विश्रांती आणि दिवसा भीक मागणे, हा त्यांचा शिरस्ता आहे.

बाहेर जिल्ह्यातील अनेक कुटुंब

जळगाव शहरात भीक मागणाऱ्या मुलांमध्ये अनेक जण बाहेर जिल्ह्यातील व आदिवासी भागातील असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या काळातदेखील अनेक जणांनी जळगावात आश्रय घेतला. भीक मागून उपजीविका भागविणे ही नित्याचीच बाब झाली आहे. भीक मागणारे बालक जिल्ह्यातील विविध भागातील आहेत. मात्र, ना शिक्षण, ना सामाजिक भान, अशीच त्यांची स्थिती आहे.

बालहक्क कोण मिळवून देणार?

रेल्वे स्टेशन परिरसरात भीक मागणाऱ्या २०१९ मुलांना समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत २५ राज्यात त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. भीक मागणारी काही मुले पोलीस सहकार्य व बाल कल्याण समितीच्या आदेशाने ताब्यात घेऊन बालगृहात ठेवण्यात आले होते. जळगाव व भुसावळात बालसंस्कार वर्ग सुरू करण्यात आले आहे.

-सपना श्रीवास्तव, समन्वयक, समतोल प्रकल्प