शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पेटलेल्या ट्रकमधून गव्हाची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 21:29 IST

महादेव तांड्याजवळील घटना । ग्रामस्थांनी पोती घेऊन केला पोबारा

भुसावळ : मध्यप्रदेशातून औरंगाबादकडे गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने यात गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना महादेव तांडा येथे शनिवार रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. अपघातासमयी मदत करण्या ऐवजी या घटनेचा ग्रामस्थांनी गैरफायदा घेत ट्रकमधील गव्हाचे पोती लुटून नेल्याचा अमानवीय प्रकार यावेळी घडला.मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील प्रधान या गावातून गहू भरून तो औरंगाबाद मधील अंजली गावात ट्रकने (एम. पी. १२, एच. ओ. १९२) नेला जात असताना हा ट्रक भुसावळ ते जामनेर दरम्यान, असलेल्या महादेवतांडा येथे आला असता, अचानक ट्रकचे स्टार्टर गरम होऊन जळाल्याचा वास येऊ लागला. यावेळी चालकाच्या सांगण्यावरून क्लीनरने पाहिले असता याला आग लागल्याचे दिसून आले. त्यावर सोबत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतील पाणी टाकले असता आग आणखीच भडकली. तर आजुबाजुच्या काही नागरिकांनी येऊन माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने आणखीच भडका घेतला.दरम्यान ट्रक रस्त्याच्या मधोमध पेटल्याने भुसावळ ते जामनेर मार्गावर दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास यश आले. यानंतर काही स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला बांधून ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.गहू नेण्यासाठी क्लिनरला केली मारहाणगव्हाच्या ट्रकला आग लागल्याची वार्ता शेजारील गावात पोहचताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मदत करण्याऐवजी ट्रकमधील क्लीनरला मारहाण करुन गव्हाची पोते घेऊन पोबारा केला. तर चालकाने येथून पळून जात जवळच असलेल्या पोलिस चौकीमध्ये जाऊन आपला बचाव केला. यामध्ये १८ टन (२८५ पोते) गहू होता असे ट्रक चालक शेख फिराज शेख शहा याने सांगितले.