शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

वाळू गटांना प्रतिसाद न मिळण्यात काय खेळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील २१ पैकी केवळ आठ वाळू गटांना प्रतिसाद मिळून त्यांचे लिलाव झाले. मात्र, १३ वाळू गटांना प्रतिसादच नसल्याने अखेर ...

जिल्ह्यातील २१ पैकी केवळ आठ वाळू गटांना प्रतिसाद मिळून त्यांचे लिलाव झाले. मात्र, १३ वाळू गटांना प्रतिसादच नसल्याने अखेर त्यांची हातची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून फेरनिविदा काढण्यात आल्या. दोन-तीनवेळाही या वाळू गटांना प्रतिसाद मिळत नसल्याने यात काही खेळी तर नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे. लिलावाला प्रतिसादच मिळत नसेल तर महसूल विभागाची उत्पन्नवाढ कशी होणार व उद्दिष्ट कसे साध्य होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वाळू गटांच्या लिलावात राजकारण होत असल्याची चर्चा आहे. एकमेकांविरोधात उघड भूमिका घेणारे अनेक दिग्गज या वाळू गट लिलावात एकत्र आले. त्यांनी एकमेकांच्या संमतीने कोण कोणता वाळू गट घेणार, हे निश्चित केले. त्यातूनच वाळूचे राजकारण रंगले. केवळ आठ गटांना प्रतिसाद मिळाल्यानंतर उर्वरित १३ गटांच्या दोन-तीनवेळा निविदा काढण्यात आल्या, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यात ज्या गटांचा लिलाव झाला तेवढेच लिलाव राहू द्यावेत व उर्वरित गटातून उचल करत राहावी, तोपर्यंत प्रतिसाद मिळत नसलेल्या गटांची किंमत आपोआप कमी होते, असे गणित मानले जाते. त्यानुसार आता १३ वाळू गटांची तशीच किंमत कमी झाली. पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारी रोजी निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला. मात्र, जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबवली गेली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर २५ टक्के हातची किंमत कमी करून फेरनिविदा काढण्यात आली आहे. २५ मार्च रोजी आलेल्या निविदा उघडल्या जाणार असून, आता २५ टक्के हातची किंमत कमी करूनही किती गटांना प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष आहे. कोरोना काळात महसूल विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने वसुलीवर लक्ष केंद्रीत केले जाऊ लागले. मात्र, अशाने उत्पन्नवाढ कशी होणार, असा प्रश्न आहे.