शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

सर्व कामे पूर्ण करू, मात्र निधी आणणार कोठून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

गिरीश महाजन यांचे पुन्हा वर्षभराचे आश्वासन : भाजपच्या अडीच वर्षात कामांचीच प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील सुप्रीम ...

गिरीश महाजन यांचे पुन्हा वर्षभराचे आश्वासन : भाजपच्या अडीच वर्षात कामांचीच प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील सुप्रीम कॉलनी भागात अमृत योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील सर्व कामे पूर्ण करू, तसेच अमृत योजना संपल्यानंतर वर्षभरात शहरातील रस्त्यांसह इतर कामे पूर्ण करण्याचे आश्वासन आपल्या भाषणाव्दारे दिले. मात्र, ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधीची गरज असते. तो निधी आणणार तरी कोठून असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मनपा निवडणुकीच्या वेळेस माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकरांना वर्षभरात विकास करण्याचे आश्वासन जळगावकर अजूनही विसरलेले नाहीत. आज महापलिकेत सत्ता येऊन भाजपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र, या अडीच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरासच करण्यात आले आहे. शहरातील रस्ते, स्वच्छता, आरोग्य अशा समस्यांवर सत्ताधाऱ्यांना तोडगा काढता आलेला नाही. जळगाव शहर आता धुळगाव म्हणून ओळखले जाऊ लागले असून, गिरीश महाजनांनी शनिवारच्या कार्यक्रमात धुळगाव होत असल्याचेही मान्य केले. तसेच शहरातील रस्त्यांची कामे अमृतमुळे थांबले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मनपा निवडणुकीत आश्वासन देत असतानाही अमृतचे काम हे अडीच वर्ष सुरूच राहणार होते. मात्र, त्यावेळी आश्वासन देताना अमृतच्या कामांचा विचार माजी मंत्र्यांनी केला नाही.

आता कामे पूर्ण करणार कशी?

१. शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करू असे आश्वासन महाजनांनी पुन्हा दिले आहे. मात्र, ही कामे करत असताना आता निधी आणणार ती कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज्यात आता भाजपची सत्ता नसल्याने निधी मिळणे कठीण आहे. त्यातच भाजपच्या सत्तेदरम्यान मिळालेल्या निधीवरील स्थगिती अजून उठलेली नाही.

२. जर राज्य शासनाकडून निधीच मिळाला नाही. तर शहरातील कामे कशी होतील? असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची कामे घेतली आहे. मात्र, ती ही मनपा फंडातून, मनपाची परिस्थिती बेताची असताना मनपा फंडातून एवढ्या निधीची कामे करणे म्हणजेच, मुंगीने एव्हरेस्ट सर करण्यासारखेच आहे.

३. त्यातच गाळेधारकांचा विषयदेखील सत्ताधाऱ्यांनी प्रलंबित ठेवला आहे. कारण मनपाची आर्थिक परिस्थिती ही गाळे प्रश्न मार्गी लागण्यानंतर सुधारू शकते, हे प्रशासनाला माहिती आहे. मात्र, हाच विषय केवळ मतांच्या राजकारणासाठी प्रलंबित ठेवला जात आहे. तर गाळेधारकांचा विषय मार्गी लागू शकत नाही. तर मनपा फंडातून होणाऱ्या कामांसाठी निधी मिळेल तरी कोठून? त्यामुळे महाजनांनी पुन्हा दिलेल्या आश्वासनाला जळगावकर किती सिरीयसली घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.