शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

सर्व कामे पूर्ण करू, मात्र निधी आणणार कोठून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

गिरीश महाजन यांचे पुन्हा वर्षभराचे आश्वासन : भाजपच्या अडीच वर्षात कामांचीच प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील सुप्रीम ...

गिरीश महाजन यांचे पुन्हा वर्षभराचे आश्वासन : भाजपच्या अडीच वर्षात कामांचीच प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील सुप्रीम कॉलनी भागात अमृत योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील सर्व कामे पूर्ण करू, तसेच अमृत योजना संपल्यानंतर वर्षभरात शहरातील रस्त्यांसह इतर कामे पूर्ण करण्याचे आश्वासन आपल्या भाषणाव्दारे दिले. मात्र, ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधीची गरज असते. तो निधी आणणार तरी कोठून असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मनपा निवडणुकीच्या वेळेस माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकरांना वर्षभरात विकास करण्याचे आश्वासन जळगावकर अजूनही विसरलेले नाहीत. आज महापलिकेत सत्ता येऊन भाजपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र, या अडीच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरासच करण्यात आले आहे. शहरातील रस्ते, स्वच्छता, आरोग्य अशा समस्यांवर सत्ताधाऱ्यांना तोडगा काढता आलेला नाही. जळगाव शहर आता धुळगाव म्हणून ओळखले जाऊ लागले असून, गिरीश महाजनांनी शनिवारच्या कार्यक्रमात धुळगाव होत असल्याचेही मान्य केले. तसेच शहरातील रस्त्यांची कामे अमृतमुळे थांबले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मनपा निवडणुकीत आश्वासन देत असतानाही अमृतचे काम हे अडीच वर्ष सुरूच राहणार होते. मात्र, त्यावेळी आश्वासन देताना अमृतच्या कामांचा विचार माजी मंत्र्यांनी केला नाही.

आता कामे पूर्ण करणार कशी?

१. शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करू असे आश्वासन महाजनांनी पुन्हा दिले आहे. मात्र, ही कामे करत असताना आता निधी आणणार ती कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज्यात आता भाजपची सत्ता नसल्याने निधी मिळणे कठीण आहे. त्यातच भाजपच्या सत्तेदरम्यान मिळालेल्या निधीवरील स्थगिती अजून उठलेली नाही.

२. जर राज्य शासनाकडून निधीच मिळाला नाही. तर शहरातील कामे कशी होतील? असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची कामे घेतली आहे. मात्र, ती ही मनपा फंडातून, मनपाची परिस्थिती बेताची असताना मनपा फंडातून एवढ्या निधीची कामे करणे म्हणजेच, मुंगीने एव्हरेस्ट सर करण्यासारखेच आहे.

३. त्यातच गाळेधारकांचा विषयदेखील सत्ताधाऱ्यांनी प्रलंबित ठेवला आहे. कारण मनपाची आर्थिक परिस्थिती ही गाळे प्रश्न मार्गी लागण्यानंतर सुधारू शकते, हे प्रशासनाला माहिती आहे. मात्र, हाच विषय केवळ मतांच्या राजकारणासाठी प्रलंबित ठेवला जात आहे. तर गाळेधारकांचा विषय मार्गी लागू शकत नाही. तर मनपा फंडातून होणाऱ्या कामांसाठी निधी मिळेल तरी कोठून? त्यामुळे महाजनांनी पुन्हा दिलेल्या आश्वासनाला जळगावकर किती सिरीयसली घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.