शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

आम्ही बी माणसं आहोत....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

लेखक- प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर रस्त्याने जाता-जाता भांडे घासणाऱ्या एक मावशी भेटल्या. थांबलो अन् त्यांना विचारले, ‘काय ...

लेखक- प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर

रस्त्याने जाता-जाता भांडे घासणाऱ्या एक मावशी भेटल्या. थांबलो अन् त्यांना विचारले,

‘काय चाललंय मावशी’

‘काही नाही, काम करून घरी जातेय सर.’

‘इतक्या उशिरा’

‘हो मग काय करावे सर, आता कामे वाढली आहेत.’

‘प्रत्येकाच्या घरी बाहेर शिकायला गेलेली मुलं कोरोनामुळे घरी आली आहेत. त्यो मोठा आजार आलाय म्हणं. त्यांना सुट्या दिल्या आहेत.’

‘मी हसत-हसत म्हणालो, तुम्हाला नाहीत सुट्या.’

‘आम्हाला कशाच्या आल्यात सुट्या... आम्हा गरिबाचं काय खरं हाय...आम्ही कुणाच्या मापात नाहीत. आमचं हातावर पोट हाय. काम केलं तर खायला मिळतंय. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नोकरदार माणसांचा वेगळाच आहे. खरं तर उलट मला आता जास्त काम लागत आहे. कपडे, भांडे जास्तीचे धुवावे लागत आहेत. म्हणून घरी जायला ह्यो टाइम झाला आहे. आम्ही काम केलं तरच पोटाला मिळणार आहे. आमच्या मुलाबाळांना खायला मिळणार आहे. आमचा न सरकार न कोण बी विचार करीत नाही वो सर.’

‘हो मावशी, तुमचं म्हणणं सारं खरं आहे; पण कोरोना नावाचा महाभयंकर आजार आला आहे.’

‘हो सर, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. तुम्हाला तरी सरकारने सुट्या दिल्या आहेत. सरकार पगार देईन; पण आमच्यासारख्या गरिबांचे काय? बेहाल आहेत. आमच्याकडे लोक कामगार म्हणून बघतात. आमच्या भावना, दुःख, व्यथा, वेदना याचं काहीच कुणाला देणं-घेणं नाही. काय करावे, कुणाला सांगावे? नशिबाचे भोग आहेत सारे.’‘हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे... मावशी; पण तुम्ही कोरोनापासून बचाव करा. सगळ्यांची काळजी घ्या.’

‘हो, पण कशाची आली काळजी, हल्ली माणसं माणसासारखी वागत नाहीत. पहिला जमाना आता राहिला नाही. पहिल्या काळासारखी माणसं माणुसकीची राहिली नाहीत. बाई घरकामाला लावली म्हणजे तिच्याकडून किती काम करून घ्यावं हे नोकरदार, पैशावाल्या, पगारदार माणसांना समजतच नाही... काय करावं, काम केल्याशिवाय गत्यंतर नाही.’

‘हो मावशी, माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाहीत. माणुसकी विसरत चालली आहेत. कोणाला कोणाचं देणं-घेणं राहिलेलं नाही. तरीही तुम्ही कोरोनापासून सावध राहा. तुमची, तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. येतो.’

‘हो ठीक आहे, काळजी घेतो; पण आम्ही कामगार माणसं, कामावाली माणसं.’ ‘आम्ही बी माणसं आहोत’ हे मात्र आजची हल्लीची माणसं विसरत चालली आहेत.

खरे तर त्या मावशीचे बोलणे ऐकून समाजातील मानवता हरवत चालली आहे असेच चित्र दिसत आहे. म्हणून वेळप्रसंगी माणसाने माणसाला समजून घेऊन माणुसकीने वागणे महत्त्वाचे आहे. कोरोनाने खूप काही शिकविले आहे हे प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवे. माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे. स्वार्थ, अहंकार, मोठेपणा, जात, धर्म बाजूला फेकला पाहिजे. प्रेम आणि मानवतेचा धर्म जागवायला हवा.