शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

आम्ही बी माणसं आहोत....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

लेखक- प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर रस्त्याने जाता-जाता भांडे घासणाऱ्या एक मावशी भेटल्या. थांबलो अन् त्यांना विचारले, ‘काय ...

लेखक- प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर

रस्त्याने जाता-जाता भांडे घासणाऱ्या एक मावशी भेटल्या. थांबलो अन् त्यांना विचारले,

‘काय चाललंय मावशी’

‘काही नाही, काम करून घरी जातेय सर.’

‘इतक्या उशिरा’

‘हो मग काय करावे सर, आता कामे वाढली आहेत.’

‘प्रत्येकाच्या घरी बाहेर शिकायला गेलेली मुलं कोरोनामुळे घरी आली आहेत. त्यो मोठा आजार आलाय म्हणं. त्यांना सुट्या दिल्या आहेत.’

‘मी हसत-हसत म्हणालो, तुम्हाला नाहीत सुट्या.’

‘आम्हाला कशाच्या आल्यात सुट्या... आम्हा गरिबाचं काय खरं हाय...आम्ही कुणाच्या मापात नाहीत. आमचं हातावर पोट हाय. काम केलं तर खायला मिळतंय. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नोकरदार माणसांचा वेगळाच आहे. खरं तर उलट मला आता जास्त काम लागत आहे. कपडे, भांडे जास्तीचे धुवावे लागत आहेत. म्हणून घरी जायला ह्यो टाइम झाला आहे. आम्ही काम केलं तरच पोटाला मिळणार आहे. आमच्या मुलाबाळांना खायला मिळणार आहे. आमचा न सरकार न कोण बी विचार करीत नाही वो सर.’

‘हो मावशी, तुमचं म्हणणं सारं खरं आहे; पण कोरोना नावाचा महाभयंकर आजार आला आहे.’

‘हो सर, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. तुम्हाला तरी सरकारने सुट्या दिल्या आहेत. सरकार पगार देईन; पण आमच्यासारख्या गरिबांचे काय? बेहाल आहेत. आमच्याकडे लोक कामगार म्हणून बघतात. आमच्या भावना, दुःख, व्यथा, वेदना याचं काहीच कुणाला देणं-घेणं नाही. काय करावे, कुणाला सांगावे? नशिबाचे भोग आहेत सारे.’‘हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे... मावशी; पण तुम्ही कोरोनापासून बचाव करा. सगळ्यांची काळजी घ्या.’

‘हो, पण कशाची आली काळजी, हल्ली माणसं माणसासारखी वागत नाहीत. पहिला जमाना आता राहिला नाही. पहिल्या काळासारखी माणसं माणुसकीची राहिली नाहीत. बाई घरकामाला लावली म्हणजे तिच्याकडून किती काम करून घ्यावं हे नोकरदार, पैशावाल्या, पगारदार माणसांना समजतच नाही... काय करावं, काम केल्याशिवाय गत्यंतर नाही.’

‘हो मावशी, माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाहीत. माणुसकी विसरत चालली आहेत. कोणाला कोणाचं देणं-घेणं राहिलेलं नाही. तरीही तुम्ही कोरोनापासून सावध राहा. तुमची, तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. येतो.’

‘हो ठीक आहे, काळजी घेतो; पण आम्ही कामगार माणसं, कामावाली माणसं.’ ‘आम्ही बी माणसं आहोत’ हे मात्र आजची हल्लीची माणसं विसरत चालली आहेत.

खरे तर त्या मावशीचे बोलणे ऐकून समाजातील मानवता हरवत चालली आहे असेच चित्र दिसत आहे. म्हणून वेळप्रसंगी माणसाने माणसाला समजून घेऊन माणुसकीने वागणे महत्त्वाचे आहे. कोरोनाने खूप काही शिकविले आहे हे प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवे. माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे. स्वार्थ, अहंकार, मोठेपणा, जात, धर्म बाजूला फेकला पाहिजे. प्रेम आणि मानवतेचा धर्म जागवायला हवा.