शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

मन्याड धरणाची साठीकडे वाटचाल; गिरणा ४५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST

पुढील काही दिवसांत मन्याड परिसरात एक-दोन दमदार पाऊस झाल्यास लवकरच मन्याड १०० टक्के भरून हॅट्ट्रिक करील, असे गिरणा पाटबंधारे ...

पुढील काही दिवसांत मन्याड परिसरात एक-दोन दमदार पाऊस झाल्यास लवकरच मन्याड १०० टक्के भरून हॅट्ट्रिक करील, असे गिरणा पाटबंधारे विभागाचे, चाळीसगाव येथील उपअभियंता हेमंत व्ही. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सलग दुसऱ्यांदा मन्याड १०० टक्के भरले होते. यावर्षी लेटलतीफ पावसामुळे एक महिना उशिरा भरेल असे वाटत आहे. सन २०१९ मध्ये ऑक्टोबरमध्ये मन्याड १०० टक्के भरले होते. सन २०२०च्या ऑगस्टमध्ये १०० टक्के भरले होते.

यावर्षी २०२१मध्ये सप्टेंबरमध्ये धरण १०० टक्के भरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण चार-पाच दिवसांपूर्वी ३५ टक्क्यांवर असलेले मन्याड धरण चार- पाच दिवसांतच ५५ टक्के झाल्याने रविवारपर्यंत ६० टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माणिकपुंज शुक्रवारी शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागल्याने मन्याड परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण माणिकपुंजमधील पाण्याचा विसर्ग मन्याड धरणात येत असल्याने त्याचा फायदा मन्याड धरण भरण्यासाठी होतो. याशिवाय धरणाच्या लाभक्षेत्रात मन्याड खोऱ्यातील नारळा-पारळा भागात दमदार पाऊस झाल्याने शुक्रवारी माणिकपुंज ओसंडून वाहू लागल्याने लाभक्षेत्रातील जळगाव बुद्रुक, जळगाव खुर्द, पिंपरखेड आदी भागांतील शेतकरी आनंदी झाले आहेत.

मन्याड धरणावर विसंबून असणारी गावे

काकळणे, मंगळणे, नांद्रे, अलवाडी, देशमुखवाडी, तळोंदा, पिंप्री, शिरसगाव, ब्राम्हणशेवगे, माळशेवगे, पिंपळवाड निकुंभ, सायगाव, टाकळी, पिंपळवाड म्हाळसा, आडगाव, उंबरखेड, देवळी, चिंचखेडे, दडपिंप्री, डोणपिंप्री, इत्यादी गावांचा सिंचनाचा व काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मन्याड धरणामुळे सुटतो. धरण सलग तिसऱ्या वर्षी हॅट्ट्रिक करीत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मन्याडसह गिरणा धरणदेखील १०० टक्के भरत आल्याने दोन वर्षांपासून सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लागला आहे. यावर्षीदेखील दोन्ही धरणे हॅट्ट्रिक करतील, अशी अपेक्षा आहे. कारण येणारा पुढील पाऊस चांगला आहे. त्यामुळे लवकरच मन्याड व गिरणा धरण १०० टक्के भरेल. मन्याड परिसरात एक-दोन दमदार पाऊस झाल्यास मन्याड लवकरच १०० टक्के भरेल. त्यानंतर गिरणादेखील भरेल. सलग तीन वर्षे दोन्ही धरणांनी साथ दिल्यास गिरणा व मन्याड परिसरातील शेतकऱ्यांना पुढील रबी हंगाम चांगला घेता येईल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल.

-हेमंत व्ही. पाटील

उपअभियंता गिरणा पाटबंधारे विभाग

चाळीसगाव

मन्याड सलग तिसऱ्या वर्षी हॅट्ट्रिक करीत असल्याने मन्याड परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण या परिसरातील नागरिकांचे जीवन मन्याड धरणावर अवलंबून आहे. धरण भरले तरच रबी हंगाम घेता येतो. धरण भरले नाही तर रबी हंगामाचे तर सोडाच; गुरांना चारा व पाणीदेखील उपलब्ध होत नाही. आज मन्याड साठी पार करून लवकरच शंभरी पार करील, अशी अपेक्षा करूया.

-सुभाष जुलाल पाटील, प्रगतिशील शेतकरी, पिंप्री, ता. चाळीसगाव

गेल्या वर्षी सलग दुसऱ्यांदा मन्याड शंभर टक्के भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगल्याप्रकारे रबी हंगाम हाती घेतला. यावर्षीदेखील मन्याडविषयी चांगली वार्ता कानावर येत असल्याने असंख्य शेतकऱ्यांनी आतापासूनच आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे.

-विशाल भगवान पाटील,

शेतकरी, देवळी, ता. चाळीसगाव