शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

शिरूड, मंगरूळ येथे पाणी टंचाई

By admin | Updated: February 22, 2017 00:15 IST

अमळनेर : बोरी नदीत पाणी न सोडल्यास,ग्रामस्थांसह धरणावर जाऊन दरवाजे उडण्याचा सरपंचाचा इशारा

अमळनेर : तालुक्यातील मंगरुळ व शिरुड गावाच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी आटल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बोरी नदीला पाणी न सोडल्यास ग्रामस्थांसह धरणावर जावून दरवाजे उघडणार किंवा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही गावच्या सरपंचांनी दिला आहे.तालुक्यातील मंगरुळ व शिरुड या गावांना हिंगोणे, फापोरे शिवारातून बोरी नदीतून पाणी पुरवठा केला जातो. बोरी नदीच्या पात्रात या गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. यंदा पावसाळा कमी झाल्याने भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे विहिरी आटल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातच ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. तामसवाडी धरणाचे पाणी पारोळा तालुक्यातील शेतीसाठी राखीव ठेवल्याने पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी कोळपिंप्री शिवारापर्यंत न पोहोचल्याने विहिरी भरु शकल्या नाहीत. बहादरपूर येथे पाट्या टाकून पाणी अडविण्यात आले होते. संतप्त ग्रामस्थांनी त्या पाट्या काढल्या. मात्र तरीही पाणी विहिरींपर्यंत न आल्याने टंचाईची झळ पोहोचली आहे. बोरी नदीतून आणखी पाणी सोडण्यात यावे, अन्यथा दोन्ही तीनही गावांचे ग्रामस्थ मिळून बोरी धरणावर जावून दरवाजे उघडू किंवा अमळनेर तहसीलसमोर तरी तीव्र आंदोलन  करु असे मंगरुळचे सरपंच अनिल अंबर पाटील यांनी सांगितले.धरणात मर्यादीत साठा शिल्लक असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. मंगरुळ आणि शिरुड गावांना टँकरने पाणी पुरवठा करणे अशक्य  असल्याचे अनिल पाटील व शिरुडचे सरपंच महेंद्र पाटील म्हणाले. शेतीचे राखीव पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी द्यावे. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी महत्वाचे आहे. पाणी टंचाईबाबत आणि आरक्षणाबाबत प्रस्ताव पाठवले  जातात. मात्र ते स्वीकारले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.गिरणेचे पाणी जर बोरी धरणात सोडले तर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होवून अमळनेर व पारोळा तालुक्यातील काही गावांची पाणी समस्या सुटू शकते.त्याचप्रमाणे मेहेरगाव येथेही पाणी टंचाई भासत असून विहीर अधिग्रहणाचे आदेश  दिले आहेत. कुºहे येथेही पाणी टंचाई भासत आहे.  तीनपैकी एक विहीर कोरडी झाली आहे. दोन विहिरींमध्ये पुनर्भरणाचे पाणी असल्याने ते पाणी पिण्यायोग्य नाही असे गावकºयांचे म्हणणे आहे. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांना पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश दिले.(वार्ताहर)धानोरा, भोरटेक येथे टंचाईवर मात करण्यासाठी विहिर अधिग्रहणाचे आदेश दिले आहेत. अधिग्रहीत विहिरींपासून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन ग्रा.प.ने टाकावी किंवा  तसा प्रस्ताव तातडीच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत सादर करावा अस तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.४कावपिंप्री, इंदापिंप्री येथेही तीव्र पाणी टंचाई भासत आहे. या गावाची पाणी पुरवठा योजनेची विहीर जवळच असलेल्या ‘बोडी गाय’ धरणात आहे. मात्र यंदा पावसाचे पाणी कमी असल्याने हे धरण आटले आहे.