शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

शिरूड, मंगरूळ येथे पाणी टंचाई

By admin | Updated: February 22, 2017 00:15 IST

अमळनेर : बोरी नदीत पाणी न सोडल्यास,ग्रामस्थांसह धरणावर जाऊन दरवाजे उडण्याचा सरपंचाचा इशारा

अमळनेर : तालुक्यातील मंगरुळ व शिरुड गावाच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी आटल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बोरी नदीला पाणी न सोडल्यास ग्रामस्थांसह धरणावर जावून दरवाजे उघडणार किंवा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही गावच्या सरपंचांनी दिला आहे.तालुक्यातील मंगरुळ व शिरुड या गावांना हिंगोणे, फापोरे शिवारातून बोरी नदीतून पाणी पुरवठा केला जातो. बोरी नदीच्या पात्रात या गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. यंदा पावसाळा कमी झाल्याने भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे विहिरी आटल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातच ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. तामसवाडी धरणाचे पाणी पारोळा तालुक्यातील शेतीसाठी राखीव ठेवल्याने पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी कोळपिंप्री शिवारापर्यंत न पोहोचल्याने विहिरी भरु शकल्या नाहीत. बहादरपूर येथे पाट्या टाकून पाणी अडविण्यात आले होते. संतप्त ग्रामस्थांनी त्या पाट्या काढल्या. मात्र तरीही पाणी विहिरींपर्यंत न आल्याने टंचाईची झळ पोहोचली आहे. बोरी नदीतून आणखी पाणी सोडण्यात यावे, अन्यथा दोन्ही तीनही गावांचे ग्रामस्थ मिळून बोरी धरणावर जावून दरवाजे उघडू किंवा अमळनेर तहसीलसमोर तरी तीव्र आंदोलन  करु असे मंगरुळचे सरपंच अनिल अंबर पाटील यांनी सांगितले.धरणात मर्यादीत साठा शिल्लक असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. मंगरुळ आणि शिरुड गावांना टँकरने पाणी पुरवठा करणे अशक्य  असल्याचे अनिल पाटील व शिरुडचे सरपंच महेंद्र पाटील म्हणाले. शेतीचे राखीव पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी द्यावे. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी महत्वाचे आहे. पाणी टंचाईबाबत आणि आरक्षणाबाबत प्रस्ताव पाठवले  जातात. मात्र ते स्वीकारले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.गिरणेचे पाणी जर बोरी धरणात सोडले तर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होवून अमळनेर व पारोळा तालुक्यातील काही गावांची पाणी समस्या सुटू शकते.त्याचप्रमाणे मेहेरगाव येथेही पाणी टंचाई भासत असून विहीर अधिग्रहणाचे आदेश  दिले आहेत. कुºहे येथेही पाणी टंचाई भासत आहे.  तीनपैकी एक विहीर कोरडी झाली आहे. दोन विहिरींमध्ये पुनर्भरणाचे पाणी असल्याने ते पाणी पिण्यायोग्य नाही असे गावकºयांचे म्हणणे आहे. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांना पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश दिले.(वार्ताहर)धानोरा, भोरटेक येथे टंचाईवर मात करण्यासाठी विहिर अधिग्रहणाचे आदेश दिले आहेत. अधिग्रहीत विहिरींपासून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन ग्रा.प.ने टाकावी किंवा  तसा प्रस्ताव तातडीच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत सादर करावा अस तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.४कावपिंप्री, इंदापिंप्री येथेही तीव्र पाणी टंचाई भासत आहे. या गावाची पाणी पुरवठा योजनेची विहीर जवळच असलेल्या ‘बोडी गाय’ धरणात आहे. मात्र यंदा पावसाचे पाणी कमी असल्याने हे धरण आटले आहे.