शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

तळोद्यात पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: December 29, 2015 00:08 IST

हरकलालनगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

तळोदा : शहरातील हरकलालनगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराचा विस्तार वाढल्यानंतर नवीन वसाहती निर्माण झाल्या. त्यातीलच शहराच्या पूव्रेला शहादा रस्त्यावरील हरकलालनगर या वसाहतीचाही समावेश आहे. या वसाहतीत सुमारे 250-300 कुटुंब रहिवास करतात. या वसाहतीत निम्म्या ठिकाणी नळ कनेक्शन आहेत. परंतु ज्यांच्याकडे पालिकेचे नळ कनेक्शन नाहीत त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या या वसाहतीतील नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिका:यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हरकलालनगरातील निम्म्या नागरिकांना पालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. मात्र निम्म्या भागात पालिकेचे पाणी मिळत नाही. पाणी मिळत नसल्याने या कॉलनीतील निम्म्या नागरिकांना आर्थिक भरुदड सहन करीत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागातील नागरिक खासगी कूपनलिकाधारकांकडून पाणी विकत घेऊन आपले काम भागवत आहेत. खासगी कूपनलिकांमध्येही काही बिघाड झाल्यास पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. निम्म्या भागात पालिकेने पाणीटंचाई निवारणासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यासाठी या भागात पालिकेने पाणीपुरवठा करण्यासाठी जोडण्या देऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रा. आर. ओ. मगरे, महेंद्र सूर्यवंशी, डी.एम. महाले, श्यामसिंग राजपूत, एन.पी. पाटोळे, बन्सी माळी, हरचंद केदार, रूपसिंग पाडवी, एन.पी. पाटोळे, एस.व्ही. अहिरे, प्रा. बी.एस. भामरे, कालीदास एस. वाणी, बी. जी. सूर्यवंशी, के. के. वाणी, सुनील सागर, जितेंद्र शर्मा, उमाकांत परदेशी, पंकज मोरे आदी नागरिकांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)