जळगाव - खासगी शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी फीसंदर्भात वारंवार निवेदन देऊनही कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे अखेर महाराष्ट्र स्टुडंट युनियन संघटनेच्या वतीने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल व अन्नत्याग उपोषण पुकारण्यात आले आहे. सकाळी ११.३० वाजता उपोषणाला सुरुवात होईल.
कोरोनामुळे आर्थिक संकट आले असून, त्यात सामान्य माणूस हा होरपळून निघाला आहे. अशातच काही खासगी शाळा या मनमानी पद्धतीने आधी ज्याप्रकारे फी आकारत होत्या, त्याच पद्धतीने आकारून पालकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. त्यामुळे शाळांची ही मनमानी फी कमी करून केवळ ट्युशन घ्यावी आणि पालकांनी आर्थिक गळचेपी थांबवावी, अशा मागणीसाठी हे उपोषण केले जाणार आहे. या उपोषणात मासूचे ॲड. अभिजित रंधे, ॲड. नीलेश जाधव, ॲड. श्रीकांत सोनवणे, चेतन चौधरी, सचिन बिऱ्हाडे आदींचा समावेश असणार आहे.