शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ाच्या पायथ्याशी पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 14, 2017 13:19 IST

थंड पाण्यासाठी भर उन्हात त्यांना दीड ते दोन किलोमीटर्पयत पायपीट करावी लागत आहे.

ऑनलाइन लोकमतअडावद, जि. जळगाव, दि. 13 - सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेव येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी फरफट सुरू आहे. हातपंपातून पिण्यासाठी चक्क गरम पाणी मिळत आहे. थंड पाण्यासाठी भर उन्हात त्यांना दीड ते दोन किलोमीटर्पयत पायपीट करावी लागत आहे.अडावदपासून साडे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उनपदेव येथील शरभंगऋषीनगर व उनपदेव गेट जवळील वस्तीत सुमारे 125 ते 150 आदिवासी कुंटुबे वास्तव्यास आहे. अडावद ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येथील वस्तीची लोकसंख्या  450 ते 500 च्या जवळपास आहे. येथे अंगणवाडी, जि.प. प्राथमिक शाळा आहे. विजेच्या तोकडय़ा सुविधेसह पाण्यासाठी एक हातपंप आहे. परंतु या हातपंपातूनही  मोठय़ा जिकरीने पाणी येते, तेही गरम. पिण्याच्या पाण्याचे एकमेव  साधन म्हणून हातपंपच आहे.  हाताच्या ओंजळीत  घेता येणार नाही एवढे गरम पाणी या हातपंपातून येत असते.  त्यामुळे गरम पाणी थंड करून काही वेळाने प्यायला मिळते. रखरखत्या ऊन्हामुळे पाण्याची पातळी खोल जात असल्याने या हातपंपाचे पाणी केव्हाही अचानक बंद पडते. त्यामुळे पाणी सुरू असताना सर्वाची पाण्यासाठी एकच धावपळ सुरु असते. थंड पाण्यासाठी भर उन्हात येथील महिला पुरूषांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील शेतातील  कुपनलिकेवर जाऊन थंड पाणी आणावे लागते. त्यातही  वीजपुरवठा खंडीत झालेला असल्यास मोठी अडचण होत असते. असे असले तरी आदिवासी बांधवांच्या या गंभीर प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नसल्याने त्यांची मोठी फरपट होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  ग्रामपंचायत, जिल्हा परिषदसह लोकप्रतिनिधींनी तात्काळ आदिवासी बांधवांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.