शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

आत्मदहनाचा इशारा देताच प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

चाळीसगाव : रावळगाव येथील साखर कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे देणे देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. ...

चाळीसगाव : रावळगाव येथील साखर कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे देणे देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. नाशिक महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत होती. आता मात्र मालेगाव तहसीलदारांनी जप्त केलेल्या सुमारे ७६ हजार ५१२ क्विंटल साखरेचा लिलाव २९ जुलै रोजी होणार आहे.

गळीतासाठी दिलेल्या उसाची थकीत रक्कम न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्महत्या करण्याचा इशारा अलीकडेच या शेतकऱ्यांनी दिला होता.

रावळगाव कारखान्याची गाळप हंगाम २०२०-२१ मधील थकीत एफआरपी रक्कमबाबत आरआरसी अंतर्गत १७ कोटी ९८ लाख रुपये तसेच या रकमेवरील १५ टक्के देय होणारे व्याज वसूल करण्याबाबत अपर जिल्हाधिकारी नाशिक यांनी कारखान्याची जप्त केलेली मालमत्ता लिलाव करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एफआरपी थकबाकी वसुलीसाठी एस जे शुगर कारखान्याची जप्त केलेली ७६ हजार क्विंटल साखरेचा लिलाव २९ जुलै रोजी होणार आहे. या लिलावातून शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यात येणार आहेत.

मालेगाव तहसीलदारांनी १७ जून २०१२ रोजी रावळगाव साखर कारखाना सील केला होता. त्यानंतर मात्र कुठलीही कार्यवाही केली नाही. १ जुलै रोजी साखर आयुक्त, पुणे यांनी जप्त केलेली साखर विक्रीची परवानगी दिल्यानंतर तहसीलदार मालेगाव यांनी ही कार्यवाही करणे अपेक्षित होते; मात्र मालेगाव तहसील कार्यालयाने द्वितीय लेखा परीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) यांना ८ जुलै रोजी पत्र दिले. त्यावर लेखा परीक्षक यांनी महसूल विभागाचा हा विषय असून, त्यांनीच ही मालमत्ता विकावी, असे उत्तर दिले. यानंतर मालेगाव तहसील कार्यालयाने १४ जुलै रोजी पुन्हा लेखा परीक्षकांना प्राधिकृत केल्याचे कळविले.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, अपर जिल्हाधिकारी नडे यांनी १ मे २०२१ रोजी तहसीलदार मालेगाव यांना पत्र देऊन सदरची आरसी कारवाई ही तहसीलदार किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी करणे आवश्यक असल्याचे पत्र दिले आहे. शासन परिपत्रकानुसार जप्त मालमत्ता तहसीलदार किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी विक्री करणे आवश्यक असताना तहसीलदार मालेगाव हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला होता व याबाबत नाशिक विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती.

संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर ही मालमत्ता १५ दिवसांत विकून सर्व शेतकऱ्यांचे पैसे अदा करावेत, अन्यथा २ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आत्महत्या करू, असा इशारा ऊस उत्पादक शेतकरी बाळासाहेब रावसाहेब देवकर, पळासरे, प्रदीप भाऊसिंग पाटील, वरखेडे व तुकाराम बारकु पाटील वरखेडे यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर आता मालेगाव तहसील प्रशासनाने साखर विक्रीचा लिलाव काढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लढ्याला काही अंशी यश आल्याची माहिती ऊस उत्पादक शेतकरी समितीचे प्रमुख बाळासाहेब देवकर यांनी लोकमतला सांगितले.