शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

भर पावसाळ्यात ‘वाघूर’च्या जलसाठ्यात दोन टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर जळगाव व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात ...

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर जळगाव व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी १.९४ टक्क्यांनी घट होऊन तो ६५.०८ टक्क्यांवरून ६३.१४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणात पाणीसाठा कमी आहे. या साठ्यामुळे वर्षभर चिंता नाही. मात्र, पावसाची दडी पाहता दररोज पाण्याचा वापर जपून करणेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे सध्याच्या स्थितीवरून लक्षात येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील दीड महिना उलटला आहे. या कालावधीत वाघूर धरणात वाढ झाली नाहीच, उलट घट झाली आहे. यंदा सलग जोरदार पाऊस नसला तरी गेल्या दोन वर्षांपासून वाघूर व गिरणा धरण १०० टक्के भरल्याने त्यात चांगला जलसाठा राहण्यास मदत झाली. मात्र, यंदा पावसाने सर्वांची चिंता वाढविली आहे. एकीकडे शेतातील खरीप पिके पावसाअभावी करपू लागली असताना धरण साठ्यात वाढ न झाल्यास रब्बी पिकांचीही चिंता राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरण भरण्यासाठीही सलग जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यात जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरण साठ्यावर सर्वांचे लक्ष असते.

वाघूर धरण क्षेत्रात पाऊस नाही

जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये किरकोळ वाढ नोंदविली गेली असली तरी जळगाव व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाच्या साठ्यात जून महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत १.९४ टक्क्यांनी घट झाली आहे. १ जून रोजी या धरणात ६५.०८ टक्के साठा होता तो आता ६३.१४ टक्क्यांवर आला आहे. सध्या धरणात ५.५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. जळगाव जिल्ह्यात पाऊस न होण्यासह वाघूर नदीचे उगमस्थान असलेल्या अजिंठा डोंगर रांगेतही जोरदार पाऊस नसल्याने धरणात पाहिजे तशी आवक होत नाही.

गेल्या वर्षापेक्षा १५ टक्के कमी साठा

सन २०१९, २०२० अशी सलग दोन वर्षे जिल्ह्यावर तसेच वाघूर धरण क्षेत्रात वरुणराजाची कृपा झाल्याने वाघूर धरण दोनही वर्षे १०० टक्के भरले होते. त्यात गेल्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत धरण ७८.१८ टक्के भरले होते. यंदा मात्र, १८ जुलै रोजी धरणात फक्त ६३.१४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

‘वाघूर’मध्ये आवक नाही, ‘हतनूर’चा मात्र दररोज विसर्ग

जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांची स्थिती पाहता वाघूर व गिरणा धरणात आवक वाढून जलसाठा वाढीची प्रतीक्षा आहे. मात्र, दुसरीकडे हतनूर धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे हतनूर धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. मुळात या धरणात गाळाचे प्रमाण जास्त असल्याने जास्त पाणीसाठा ठेवता येत नसल्याने हा विसर्ग केला जातो.

जळगाव शहराला दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा

जळगाव शहरात दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला लागणारे हे पाणी पाहता प्रत्येक पावसाळ्यात धरणात पाण्याची आवक चांगली असणे महत्त्वाचे ठरते. शहराला दररोज लागणारे पाणी पाहता पुढील पावसाळ्यापर्यंत चिंता नाही. मात्र, पाऊस गायब झाल्यास चिंता वाढू शकते. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे ठरणार आहे.

उर्वरित दोन महिन्यांत अधिक पावसाची अपेक्षा

यंदा हवामान खात्याने जून व जुलै महिन्यात पावसाचा कमीच अंदाज वर्तविला होता. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन महिन्यात जोरदार पाऊस होऊन शेत शिवार बहरण्यासह वाघूर धरण साठ्यात वाढ होण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

धरणसाठा व पाणीपुरवठा स्थिती

- वाघूर धरणात असलेला साठा - ६३.१४ टक्के (५.५४ टीएमसी उपयुक्त साठा)

- शहराची लोकसंख्या - ६,००,०००

- शहराला दैनंदिन होणारा पाणीपुरवठा - १०० एमएलडी

- शहरातील पाण्याच्या टाकी - ५

- शहरातील नळ जोडणी - ७१,०००