शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात ‘वाघूर’च्या जलसाठ्यात दोन टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर जळगाव व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात ...

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर जळगाव व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी १.९४ टक्क्यांनी घट होऊन तो ६५.०८ टक्क्यांवरून ६३.१४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणात पाणीसाठा कमी आहे. या साठ्यामुळे वर्षभर चिंता नाही. मात्र, पावसाची दडी पाहता दररोज पाण्याचा वापर जपून करणेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे सध्याच्या स्थितीवरून लक्षात येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील दीड महिना उलटला आहे. या कालावधीत वाघूर धरणात वाढ झाली नाहीच, उलट घट झाली आहे. यंदा सलग जोरदार पाऊस नसला तरी गेल्या दोन वर्षांपासून वाघूर व गिरणा धरण १०० टक्के भरल्याने त्यात चांगला जलसाठा राहण्यास मदत झाली. मात्र, यंदा पावसाने सर्वांची चिंता वाढविली आहे. एकीकडे शेतातील खरीप पिके पावसाअभावी करपू लागली असताना धरण साठ्यात वाढ न झाल्यास रब्बी पिकांचीही चिंता राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरण भरण्यासाठीही सलग जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यात जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरण साठ्यावर सर्वांचे लक्ष असते.

वाघूर धरण क्षेत्रात पाऊस नाही

जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये किरकोळ वाढ नोंदविली गेली असली तरी जळगाव व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाच्या साठ्यात जून महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत १.९४ टक्क्यांनी घट झाली आहे. १ जून रोजी या धरणात ६५.०८ टक्के साठा होता तो आता ६३.१४ टक्क्यांवर आला आहे. सध्या धरणात ५.५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. जळगाव जिल्ह्यात पाऊस न होण्यासह वाघूर नदीचे उगमस्थान असलेल्या अजिंठा डोंगर रांगेतही जोरदार पाऊस नसल्याने धरणात पाहिजे तशी आवक होत नाही.

गेल्या वर्षापेक्षा १५ टक्के कमी साठा

सन २०१९, २०२० अशी सलग दोन वर्षे जिल्ह्यावर तसेच वाघूर धरण क्षेत्रात वरुणराजाची कृपा झाल्याने वाघूर धरण दोनही वर्षे १०० टक्के भरले होते. त्यात गेल्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत धरण ७८.१८ टक्के भरले होते. यंदा मात्र, १८ जुलै रोजी धरणात फक्त ६३.१४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

‘वाघूर’मध्ये आवक नाही, ‘हतनूर’चा मात्र दररोज विसर्ग

जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांची स्थिती पाहता वाघूर व गिरणा धरणात आवक वाढून जलसाठा वाढीची प्रतीक्षा आहे. मात्र, दुसरीकडे हतनूर धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे हतनूर धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. मुळात या धरणात गाळाचे प्रमाण जास्त असल्याने जास्त पाणीसाठा ठेवता येत नसल्याने हा विसर्ग केला जातो.

जळगाव शहराला दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा

जळगाव शहरात दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला लागणारे हे पाणी पाहता प्रत्येक पावसाळ्यात धरणात पाण्याची आवक चांगली असणे महत्त्वाचे ठरते. शहराला दररोज लागणारे पाणी पाहता पुढील पावसाळ्यापर्यंत चिंता नाही. मात्र, पाऊस गायब झाल्यास चिंता वाढू शकते. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे ठरणार आहे.

उर्वरित दोन महिन्यांत अधिक पावसाची अपेक्षा

यंदा हवामान खात्याने जून व जुलै महिन्यात पावसाचा कमीच अंदाज वर्तविला होता. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन महिन्यात जोरदार पाऊस होऊन शेत शिवार बहरण्यासह वाघूर धरण साठ्यात वाढ होण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

धरणसाठा व पाणीपुरवठा स्थिती

- वाघूर धरणात असलेला साठा - ६३.१४ टक्के (५.५४ टीएमसी उपयुक्त साठा)

- शहराची लोकसंख्या - ६,००,०००

- शहराला दैनंदिन होणारा पाणीपुरवठा - १०० एमएलडी

- शहरातील पाण्याच्या टाकी - ५

- शहरातील नळ जोडणी - ७१,०००