शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मनपा निवडणुकीसाठी २१ मे रोजीची मतदार यादी धरणार ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:25 IST

निवडणूक आयोगाचे आदेश

ठळक मुद्दे मतदार संख्येत सुमारे ५ हजारांची वाढ शक्य मतदारसंख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाजतर ३६१३ मतदार राहणार वंचित

सुशील देवकरजळगाव: मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ मे २०१८ रोजी अस्तित्वात असलेली मतदार संख्या (यादी) ग्राह्य धरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मनपाला दिले आहेत. त्यामुळे २१ मेच्या आत नोंदविलेली नावे या यादीत समाविष्ट होणार असून मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत जेमतेम ५ हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे.मतदारसंख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज१. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे १० जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार जळगाव शहरात पुरूष मतदार १ लाख ९० हजार ३३०, स्त्री मतदार १ लाख ६८ हजार ६३६ व इतर २५ असे एकूण ३ लाख ५८ हजार ९९१ मतदार आहेत.२. ही यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४ महिन्यात नवीन मतदारांचे नोंदणीसाठी ५हजार ६६३ अर्ज आले आहेत. तर नाव वगळण्यासाठी ८५५ अर्ज आले आहेत. म्हणजेच यातील किमान ३ हजार मतदारांची नावे मतदार यादीत २१ मे पूर्वी समाविष्ट होतील.३. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत जेमतेम ५ हजार मतदारांची वाढ होऊन ही संख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीच्यावेळी म्हणजेच २०१३ मध्ये मतदार संख्या ३ लाख ५७३३६ इतकी होती.तर ३६१३ मतदार राहणार वंचित१० जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४ महिन्यात नवीन मतदारांचे नोंदणीसाठी ५६६३ अर्ज आले आहेत.त्यापैकी १०३९ अर्ज राज्यस्तरावरून मंजूर झाले आहेत. मात्र अद्यापही ३६१३ अर्जांवर कार्यवाहीच झालेली नाही. ती प्रक्रिया २१ मेच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातही रविवार सुटीचा दिवस वगळता जेमतेम ४ दिवस उरले आहेत. या चार दिवसांत हे ३ हजार ६१३ मतदारांच्या नोंदणीवर निर्णय न झाल्यास त्यांना येत्या मनपा निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.मनपाच प्रसिद्ध करणार मतदार यादीमनपा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध मतदार यादी मनपाला पुरविली जाईल. तर त्यानंतर २१ मे च्या आत समाविष्ट झालेल्या मतदारांची यादी निवडणूक शाखेच्या मुंबई कार्यालयाकडून मनपाला मिळेल. ती एकत्रित करून प्रभागनिहाय मतदार याद्या मनपाला प्रसिद्ध करून हरकती मागवाव्या लागून त्यानंतर अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मागील वर्षी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार ३७ प्रभागांमध्ये ३ लाख ५७ हजार ३३६ मतदार होते. त्यापैकी ६७ हजार ६७६ मतदार चिन्हांकित म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे स्वत: निवडणूक अधिकारी संजय कापडणीस यांनी जाहीर केले होते, या मतदार यादीवर अनेक हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या वादातच मतदान प्रक्रिया पार पडली होती.