शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मनपा निवडणुकीसाठी २१ मे रोजीची मतदार यादी धरणार ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:25 IST

निवडणूक आयोगाचे आदेश

ठळक मुद्दे मतदार संख्येत सुमारे ५ हजारांची वाढ शक्य मतदारसंख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाजतर ३६१३ मतदार राहणार वंचित

सुशील देवकरजळगाव: मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ मे २०१८ रोजी अस्तित्वात असलेली मतदार संख्या (यादी) ग्राह्य धरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मनपाला दिले आहेत. त्यामुळे २१ मेच्या आत नोंदविलेली नावे या यादीत समाविष्ट होणार असून मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत जेमतेम ५ हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे.मतदारसंख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज१. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे १० जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार जळगाव शहरात पुरूष मतदार १ लाख ९० हजार ३३०, स्त्री मतदार १ लाख ६८ हजार ६३६ व इतर २५ असे एकूण ३ लाख ५८ हजार ९९१ मतदार आहेत.२. ही यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४ महिन्यात नवीन मतदारांचे नोंदणीसाठी ५हजार ६६३ अर्ज आले आहेत. तर नाव वगळण्यासाठी ८५५ अर्ज आले आहेत. म्हणजेच यातील किमान ३ हजार मतदारांची नावे मतदार यादीत २१ मे पूर्वी समाविष्ट होतील.३. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत जेमतेम ५ हजार मतदारांची वाढ होऊन ही संख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीच्यावेळी म्हणजेच २०१३ मध्ये मतदार संख्या ३ लाख ५७३३६ इतकी होती.तर ३६१३ मतदार राहणार वंचित१० जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४ महिन्यात नवीन मतदारांचे नोंदणीसाठी ५६६३ अर्ज आले आहेत.त्यापैकी १०३९ अर्ज राज्यस्तरावरून मंजूर झाले आहेत. मात्र अद्यापही ३६१३ अर्जांवर कार्यवाहीच झालेली नाही. ती प्रक्रिया २१ मेच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातही रविवार सुटीचा दिवस वगळता जेमतेम ४ दिवस उरले आहेत. या चार दिवसांत हे ३ हजार ६१३ मतदारांच्या नोंदणीवर निर्णय न झाल्यास त्यांना येत्या मनपा निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.मनपाच प्रसिद्ध करणार मतदार यादीमनपा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध मतदार यादी मनपाला पुरविली जाईल. तर त्यानंतर २१ मे च्या आत समाविष्ट झालेल्या मतदारांची यादी निवडणूक शाखेच्या मुंबई कार्यालयाकडून मनपाला मिळेल. ती एकत्रित करून प्रभागनिहाय मतदार याद्या मनपाला प्रसिद्ध करून हरकती मागवाव्या लागून त्यानंतर अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मागील वर्षी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार ३७ प्रभागांमध्ये ३ लाख ५७ हजार ३३६ मतदार होते. त्यापैकी ६७ हजार ६७६ मतदार चिन्हांकित म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे स्वत: निवडणूक अधिकारी संजय कापडणीस यांनी जाहीर केले होते, या मतदार यादीवर अनेक हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या वादातच मतदान प्रक्रिया पार पडली होती.